सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी.

यंदा सोयाबीन शेतीत उत्पादन अत्यंत कमी आणि त्यातही भाव नाही, त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं शासकीय हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करावीत. तसेच झालेल्या नुकसान भरभाई देखील लवकर देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांकडुन मागणी होतेय. या हंगामात सोयाबीन पिकावर पेरणीपासून संकटे सुरूच आहेत. ‘येलो मोझॅक रोगानं आक्रमण करून शेंगा भरण्या अगोदरच झाड पिवळे केले, म्हणून शेंगा अर्ध्याहून अधिक प्रमाणात भरल्या गेल्या नाहीत. त्यात पावसानं मारलेली दडी, याचा देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. कारण आज शेतकऱ्यांना एकरी २ ते ३ क्विंटल इतकं सोयाबीन होत असून उत्पादन कमी होत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला अपेक्षानुसार भाव नाही, आज अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही काढता आला नाही. त्यात सोयाबीन दरात सात्यत्याने चढ-उतार होत आहे. विदर्भातील अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ ऑक्टोबर रोजी सरासरी भाव ४ हजार २०० रूपये आहे. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झालाय.
११ ऑक्टोबर रोजी सोयाबीनला ४ हजार रुपये इतका सरासरी भाव होता. त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन दर ४ हजार २०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटमागे गेले. परंतु त्यानंतर हे भाव ३०० रुपयांनी पुन्हा घसरले अन् ३ हजार ९०० रुपयांपर्यत आले. दरम्यान १६ ऑक्टोंबरपासून सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. यादिवशी कमीत कमी ३ हजार ७५० पासून जास्तीत जास्त ४ हजार ५०० रूपये तर सरासरी भाव ४ हजार १७० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. आज मंगळवारी म्हणजेच १७ ऑक्टोंबर रोजी सरासरी भाव ४ हजार २०० रूपये तर कमीत कमी ३ हजार २०० पासून जास्तीत जास्त ४ हजार ५१० रूपये होता. परंतु आजच्या दिवशी या हंगामात सर्वाधिक जादा सोयाबीन खरेदी झालं आहे, ५ हजार ८९८ इतकी क्विंटलची अकोल्याच्या बाजारात आवक झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत