नाना पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात शीतयुद्ध सुरू_ चंद्रशेखर बावनकुळे.

Pimpri : आपली व्यथा मांडणाऱ्या एका पूरग्रस्ताला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओढून नेल्याच्या नागपुरातील घटनेवर विरोधकांनी तुफान हल्लाबोल केला. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी रविवारी नगर येथे केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले. त्यातून महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढाई सुरू झाली आहे.
‘महाविजय-2024’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्याअंतर्गत नगर येथे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बावनकुळेंनी संवाद साधला. या वेळी त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरुद्ध एकही बातमी प्रसिद्ध होऊ नये, यासाठी महिन्यातून एकदा पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा (चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजले असेलच तुम्हाला), त्यांना ढाब्यावर घेऊन जा, असे उपस्थितांना सांगितले. याबाबतचे वृत्त आज प्रसिद्ध होताच ते विरोधकांनी निशाण्यावर आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आघाडीवर आहेत.
बावनकुळेजी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ? असा रोकडा सवाल वडेट्टीवारांनी केला आहे. देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही, असं ते म्हणाले. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा धाक दाखवून भाजप विरुद्ध आवाज दाबत आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले ? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेलासुद्धा चिरीमिरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की. पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे, अशी तोफ त्यांनी डागली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत