मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

बालविवाह मुक्त भारत साठी महिलांचा निर्धार.

धाराशिव:- सोमवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२३, कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन नवी दिल्ली (नोबेल पुरस्कार विजेते) आणि दिशा समाज विकास संस्था संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान ची सुरुवात करण्यात आली. हे अभियान धाराशिव जिल्ह्यातील कारी, आंबेजवळगे, गुंजवाडी, सोनेगांव, शिंगोली, घाटनंग्री अशा एकूण 25 गावांमध्ये राबविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव, सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विद्यार्थिनी, विद्यार्थी यांचा समावेश होता. शाळा, बस स्थानक, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वच क्षेत्रातून लोकांचा सहभाग वाढत आहे. अभियानामुळे खरोखरच बालविवाह निर्मूलन होणार आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. जर एखाद्या गावात बालविवाह होत असेल तर तात्काळ गावातील ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, यांना माहिती द्यावी किंवा 1098 हा नंबर डायल माहिती द्यावी कारण बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे. बालविवाहा मुळे बालकांचे बालपण हिरावून घेतले जाते तसेच त्यांचे शिक्षण अर्धवट राहते त्यांची शारीरिक मानसिक वाढ झालेली नसते यामुळे भविष्यात त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते, मुलींचे लग्न तिच्या वयाचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करावे आणि मुलाचे लग्न त्याच्या वयाचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच करावे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ऍड बाबासाहेब वडवे यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच रेल्वे पोलीस फोर्स (RPF ), एस टी आगार, आरोग्य विभाग क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यापुढेही आवश्यक ते नियोजन करून बालविवाह विरोधी जनजागृती व लढा उभा करण्याचा निर्धार करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!