महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच अनावरण.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे (गोपीनाथ मुंडे) यांच्या पुतळ्याच्या अनावरण आज नाशिकमध्ये होत आहे. त्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे (पंकजा मुंडे) या नाशिकमध्ये दाखल झाल्या असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांना नाशकात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही असे पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही, ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे. मी या कार्यक्रमाची यजमान नाही त्यामुळे यावर बोलणे अयोग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. यावर त्या म्हणाल्या की, सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी माझीही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज गोपीनाथ मुंडे असते तर परिस्थिती वेगळी असती का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी म्हटले की, जर पक्षात काही नेते आज असते तर निश्चितपणे राजकीय चित्र वेगळे असते. मुंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!