जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी बांधवांसाठी दहा दिवसीय विपश्यना शिबिर.
लातूर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी २ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहास भेट दिली असता १८ ते ४५ वयोगटातील अनेक तरुण कैदी येथे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या तरुणांशी संवाद साधला असता हे तरुणांसाठी दिशादर्शक वाटचालीसाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले.
सूडाची भावना नष्ट करून मैत्रीभाव वाढला पाहिजे. या जाणिवेतून जिल्हाधिकाऱ्यांनी विपश्यना समितीच्या माध्यमातून मध्यवर्ती कारागृहात विपश्यना शिबिर २९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी आणि रात्री ४० बंदी बांधवांसाठी आयोजन करण्यात आले. विपश्यना कालावधीत कैद्यांसाठी विशेष आसन व्यवस्था व सात्त्विक भोजन व्यवस्था करण्यात आली होती. ९ ऑक्टोबर, २०२३ रोजी सदरील शिबिराची सांगता झाली. सांगता सत्रामध्ये कैद्यांचे अभिप्राय थक्क करणारे होते. विपश्यनेतून पुढील वाटचालीचा मार्ग गवसलाआम्ही भूतकाळ विसरुन वर्तमानात जगायला शिकलो, वैरभाव पूर्णपणे निघून गेला, अशा प्रकारचा सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विपश्यना साधनेचा मूळ उद्देश हा परस्परातील द्वेष आणि द्रोह या दुर्गुणापासून सुटका सांप्रदायिक व संकुचित वृत्तीच्या बंधनातून मुक्ति, सुखी समाजाचा स्वास्थ्य सुखी सदस्य बनणे, स्वमंगल आणि सर्वांचे मंगल या भावनांनी परिपूर्ण विधायक आणि सृजनात्मक जीवन सुधारणे हा असल्याने कैद्यांना हे विपश्यना शिबिर जीवनाच्या पुढील वाटचालीकरिता नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असे कैद्यांनी व्यक्त केलेल्या भावनेतून दिसून आले.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सांत्वन, लातूर विपश्यना समितीचे भुतडा, बिरले यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य केले. त्यामुळे शिबिर यशस्वी झाले. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी या शिबिरासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाचे काम केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत