भारतात हवामान बदलाचा परिणाम दिसतो?

हवामान बदलामुळे गेल्या तीन दशकांमध्ये गंगा नदीच्या पात्रात आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण कमी होत आहे; तर वायव्य भारत, पश्चिम घाट, तमिळनाडू, रायलसीमा, तेलंगणा आदी प्रदेशांत प्रमाणाबाहेर पाऊस पडत आहे. हवामान बदलामुळे एकीकडे पावसाचे दिवस कमी होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसाच्या घटनाही घडत आहेत.
अधूनमधून पाऊस पडणे आणि उष्णता वाढणे हादेखील हवामान बदलाचा दुष्परिणाम आहे.या वर्षी महाराष्ट्रात ही स्थिती दिसलीच, पण गेल्या काही वर्षांत परतीचा पाऊस निकषाप्रमाणे आणि वेळेत परत गेलेला कधीच दिसून आला नाही. याउलट पावसाळय़ाची अखेर आणि हिवाळय़ाच्या आधी (ऑक्टोबरमध्ये) तापमानात प्रचंड वाढ होते आहे.
ऑक्टोबरमध्ये दरवर्षी तापमान वाढते, पण या वेळी तापमानवाढीचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहे. मुंबईत शुक्रवारी पारा ३६ अंश सेल्सिअसवर गेला, विदर्भातील तापमान आठवडाभर ३५ अंशांपेक्षा अधिक राहिले तर मराठवाडय़ात हीच स्थिती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील किमान तापमानाची पातळीही गेल्या दहा दिवसांत वाढते आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत