राज्यातील बालमृत्यूंना माताच जबाबदार; चित्रा वाघ यांंचे विधान

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणी विरोधकांकडून राज्यातील आरोग्य सेवा व्हेंटीलेटरवर असल्याचा आरोप केला जात आहे. शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नवजात बालकांची संख्या देखील मोठी होती.
दरम्यान या घटनेनंतर सर्व स्तरातून राज्यातील सरकारवर टीका केली जात आहे. मात्र या टीकेदरम्यान सत्ताधारी पक्ष भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. सरकारने दिलेल्या गोळ्या गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे .
सरकारकडून राज्यात गरोदर महिलांना गोळ्या दिल्या जातात, पण माता गोळ्या घेत नाहीत त्यामुळे बालमृत्यू होतात असं विचीत्र विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे.दरम्यान त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत.
डॉक्टरांनी घ्या म्हणून सांगितलेल्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदरुस्त झालं असतं. आज तुमच्या कुशीत असतं असं आम्ही त्यांना सांगितलं. आपण इथपर्यंत देऊ शकतो आपण गिळायला देऊ शकत नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत