छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म महोत्सव सोहळा निमित्त पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन


बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारस-पत्रकार उमेश सुरवसे
उमेश सुरवसे
धाराशिव दि.१९(प्रतिनिधी)-
उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथे स्वराज्य रक्षक बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जयमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन पेठसांगवी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सुमनताई धनराज सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले.
तर जेष्ठ नागरिक माणिकराव देशमुख यांनी पुजन करून नारळ फोडुन अभिवादन केले.
या वेळी गावचे उपसरपंच सिराज शेख, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी,गिरमल दलाल ,दत्तु राऊत , सोसायटी चेअरमन हारिदास भोसले,माजी सरपंच गणेश पाटील,माजी तंटामुक्त अध्यक्ष सदानंद बिराजदार, रमेश देशमुख, बाबासाहेब देशमुख, पत्रकार उमेश सुरवसे, काशिनाथ पाटील,अहमद तांबोळी,अमर यमगर,गुलचंद सुभेदार, शब्बीर मुजावर, महादेव घोडके,सिराज पठाण ज्ञानराज देशमुख,आदीजनानी नारळ फोडुन विनम्र अभिवादन केले.
या वेळी बोलताना पत्रकार उमेश सुरवसे म्हणाले की, स्वराज्य रक्षक बहुजनाचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये आठरा आलुतेदार बारा बलुतेदार तसेच राज्यातील पहिला व्यक्ती ते शेवटचा व्यक्ती यांचा विचार करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील चढ उतार यांचे राज्य गडकिल्ले या सर्वांचा तसेच राज्यामधील प्रजे साठी असलेली आपुलकी या सर्व बाबीचा अभ्यास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी करून भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व समावेशक बारा बलुतेदार आठरा आलुतेदार शेवटचा घटक यांचा विचार करून भारतीय संविधानामध्ये सर्वासाठी समान नियम करून एक प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन जयमहाराष्ट्र मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत असताना केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म महोत्सव सोहळा निमित्त पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले तर मिरवणूक सोहळा दि.२९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
आहे जयमहाराष्ट्र मित्र मंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले.
या वेळी जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल देशमुख,
उपाध्यक्ष साहेबराव देशमुख,
नामदेव देशमुख,शंभूराजे देशमुख,सुरज भोसले,गणेश देशमुख,भारत देशमुख,
दत्ता शिंदे,सुयोग देशमुख,
राहुल देशमुख, पदाधिकारी तसेच वैजनाथ यमगर तसेच गुरूलिंग पाटील, विजयकुमार देशमुख,दत्तु शिंदे ,बंडु राठोड ,सोमनाथ चव्हाण , ज्ञानेश्वर शिंदे,तसेच गावातील सर्व मंडळ पदाधिकारी तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,ग्रामस्थ यांची मोठी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानराज देशमुख यांनी केले तर आभार सोसायटी चेअरमन हारिदास भोसले यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत