महाराष्ट्रमुख्यपान

तळीयेच्या दरडग्रस्तांची प्रतीक्षा संपली.

५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात या दरडग्रस्तांना घरांचे वितरण करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील महाडजवळ तळीये येथील दरड दुर्घटनेतील ६६ कुटुंबांची पक्क्या घरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

या ६६ दरडग्रस्तांसह तळीयेतील धोकादायक परिसरातील १९७ घरांमधील कुटुंबीयांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळीये कोंढाळकरवाडी येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली आणि हाहाकार उडाला. दुर्घटनेत ६६ घरे गाडली गेली आणि ८७ ग्रामस्थांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेत बाधित झालेल्या ६६ पैकी २५ कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी कंटेनरमध्ये करण्यात आले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली १४.६४ हेक्टर जागेवर २६३ घरांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात २६३ पैकी २०० घरांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यापैकी ६६ घरांचे काम प्राधान्याने पूर्ण झाले असून ५ जानेवारी रोजी या घरांचा ताबा देण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!