सरकार ठणठणीत, महाराष्ट्र आजारी, राज ठाकरेंचा घणाघात.

औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी आरोप केला. यामुळे राज्यातील राजकारणात ठिणगी पडली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून सरकारमधील तीन पक्ष सोडून संपूर्ण महाराष्ट्र आजारी आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असे कळते. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन- तीन इंजिन् लागून पण राज्याचे आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचे काय?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.पुढे राज्य सरकावर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, “दुर्दैव असे की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल याकडे अधिक लक्ष द्यावे, असेही राज ठाकरे म्हणाले.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत