राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? – संजय राऊत.

नांदेड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेड शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला चांगलं सुनावलं आहे.
अशात आता या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित केला आहे. राज्य सरकार अस्तित्वात आहे की नाही? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “नांदेडमध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 70 रुग्ण मृत्यूला झुंज देत आहे.
गेल्या वर्षभरात ही पहिली घटना घडली नाही. कळवा रुग्णालयात घडलेली घटना अजूनही ताजी आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे.कळव्यामध्ये घडलेल्या घटनेनंतर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी दुर्दैवी घटना कशी घडू शकते? असं अजित पवारांनी म्हटलं होतं. अजित पवारांना मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं नव्हतं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत