निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविदर्भ

“प्रकाश आंबेडकर ह्यांना रिपब्लीकन का चालत नाहीत जयदिप कवाडे

पिरिपाचे बालिश प्रश्न.

काल पिरीपाचे ‘कथित राष्ट्रीय’ कार्याध्यक्ष जयदिप कवाडे अकोल्यात आले होते.अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी “प्रकाश आंबेडकर ह्यांना रिपब्लीकन का चालत नाहीत ?” असे बाळबोध प्रश्न विचारून पत्रकरांचे मनोरंजन केले.शिवाय चळवळीचे खरे वैचारिक पाईक जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले आहेत हे भलेमोठे विनोदी विधान केल्याने पत्रकारांची हसून हसून मुरकुंडी वळली असे अविश्वसनीय सूत्रांनी सांगितले.मुळात जयदीप हे कुठल्याही प्रकारे दखलपात्र नाहीत, मात्र राजकारणात कुणाचाही ‘पेड गैरसमज’ वेळेत दूर होणे गरजेचे असल्याने हा लेखन प्रपंच.
रिपब्लीकन असणे म्हणजे उठसूट निवडणुकीत जोगवा मागत फिरणे, निवडणुक आली की दुकान उभे करून वडील किंवा मुलगा ह्यांचे राजकीय सोय करून घेणे हाच ज्यांचा आदर्श त्यांना असे प्रश्न पडणे हा मालकाने कामाला लावण्याचा आणि स्क्रिप्ट नुसार अभिनयाचा नमुना आहे.बाळासाहेब आंबेडकर यांनी कधीही कुठल्याही प्रामाणिक रिपब्लीकन कार्यकर्ता चालत नाही असे म्हटले नाही, मात्र धंदेवाईक पुढारी त्यांनी कायम बाजूला ठेवले आहेत.
बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे मत काय ? ह्या पेक्षा आंबेडकरी समूहाला काय वाटते त्याची तपासणी करूया.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार, प्रादेशिक पक्ष असलेल्या आरपीआय (ए) ला २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ०.८५ टक्के मते मिळाली होती, परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण ०.१९ टक्क्यांवर घसरले.२०१९ मध्ये निवडणूक लढवलेल्या RPI(A) च्या काही सदस्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.अर्थात स्वतच्या पक्ष आणि ए बी फॉर्म न लावता भाजपचे ए बी फॉर्म वर लढले होते.कुठलाही गट असे करीत नाहीत.तरीही हे रिपब्लीकन आहेत ?

आरपीआय चे इतर छोटे गटाची तर आणखी वाईट कामगिरी आहे. रिपब्लिकन पार्टी (खोरिपा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल) या पक्षांची मतसंख्या शून्य आहे.त्यात पीरिपा कुठे आहे ह्याचा शोध जयदीप कवाडे यांनी घेतला पाहिजे.तुम्ही कोण आहेत, तुमची विचारधारा काय आणि तुम्ही करता ते जनता स्विकारते का हे निवडणुकीत ठरत असते.ही आकडेवारी जनतेचा ठाम कौल दाखवून देते.त्यामुळे तुमचे कथीत रिपब्लीकन असणे जनतेने नाकारले आहे.
दुसरा जो विनोद जयदीप ह्यांनी केला त्याचा अर्थ त्यांनी न वाचता लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचले असे गृहीत धरूया.”चळवळीचे खरे वैचारिक पाईक जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले आहेत” हा विनोद म्हणून देखील पचायला कठीण आहे.कारण २००९ मध्ये, आठवले यांच्या RPI (A) सोबत भाजपशी जुळवून घेण्याच्या निर्णयावर कवाडे यांनी कठोर टीका केली होती, ज्यांनी ज्येष्ठ दलित नेते आणि विद्यमान केंद्रीय मंत्री आंबेडकरी विचारधारेशी “तडजोड” केल्याचा गंभीर आरोप केला होता.वडील म्हणतात ‘ संधीसाधू’ आणि जयदिप मानतो ‘वैचारिक पाईक’ ! ह्यांचे बाप लेकात एकमत नाही.मात्र रोकडा धर्म असल्याने दोघेही एकमेकांना चालवून घेत आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व त्यांचा पक्ष हे २०१२ पासून भाजपसोबत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या ते जवळचे असल्याची टीका अनेकदा झाली, तरीदेखील आठवले यांनी कायम भाजपलाच पाठिंबा दिला.ज्या वेळी आंबेडकरी समूह भाजपवर टीका करीत होता, त्या वेळी ते भाजपसोबत राहिले;
भाजपशी घरोबा करून आणि आत्मसन्मान गमावून केंद्रातलं राज्यमंत्रीपद आठवले यांनी मिळवलं. त्यांच्या निर्णयाबद्दल वंचित जनमानसात रोष आहे, ही वस्तुस्थिती असून केंद्रात सामजिक न्याय राज्य मंत्री असताना तीन वर्षे स्वाधार, शिष्यवृत्ती मिळत नाही. आर टी ई कायदा बदलला, वर्ग १ ते ४ जागा आरक्षण शिवाय भरण्याचा घाट घातला गेला, बार्टी प्रशिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण आणि संशोधन निधी मिळत नाही, संशोधक विद्यार्थी अनेक महिने रस्त्यावर आहेत, अनुसूचीत जाती जमाती योजना आणि निधी मंजूर होत नाही, निधी वळविला जातो, ह्यावर कधीही आठवले भूमिका घेत नाही.त्यांचे कुणीही ऐकत नाही.ते कुठली रिपब्लीकन चळवळ चालवत आहेत ? दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना, म फुले महामंडळ ना जमीन मिळते ना अनुदान किंवा कर्ज मिळत नाही.तरीही जयदीपला ते चळवळीचे खरे वैचारिक पाईक वाटतात ह्यातच जयदिपची लायकी दिसून येते.ज्यांना भिक देखील पुरस्कार वाटत असेल त्यांची कीव केली पाहिजे.
ह्याच पिरीपाने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना पाठिंबा दिला होता.काही निवडणुका मध्ये दोघे बाप लेक थेट भाजपचे उमेद्वाराचा प्रचार करायला भाजपचे स्टेज वर हजर होते.
अलीकडेच जानेवारी 2023 मध्ये पक्षाने महाराष्ट्रात शिंदे पवार – भाजपा युतीशी करार केला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती युतीचा भाग झालेत.त्यांना प्रश्न पडला की अकोल्यात भाजप कशी निवडून येते ? किती हा बालिशपणा? तुम्हीं मालकाचे आदेशावर अकोल्यात आलात ते रिपब्लीकन चळवळीचे काम आहे का ? किती खाली पडणार आहेत ? बरे ज्या रामदास आठवले ह्यांना वैचारिक पाईक सांगितले त्याच रिपाई ने शिंदे व फडणवीस ह्यांनी आम्हाला विचारात न घेता थेट पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.१० जानेवारी २०२३ रोजी पत्रकार परिषदेत अविनाश महातेकर ह्यांनी विरोध केला आहे.अर्थात तुमची लायकी काढली होती.
सबब लोकांनी तुम्हाला नाकारले आहे.काँग्रेसने दिलेल्या उमेदवारी वर तुमचे विरूद्ध अपक्ष उमेदवार निवडून आणलेला आहे.म्हणून आता भाजप सोबत घरठाव करताना रिपब्लिकन ह्या स्वाभिमानी शब्दाचा अर्थ तरी वाचून घ्या.भिकेचा कटोरा घेवून केलेले आश्रित राजकारण आंबेडकरी समूहाने कधीही स्वीकारले नाही.त्यामुळे जनतेला तुमच्या सारखे विकाऊ चालत नाहीत.त्यात बाळासाहेब आंबेडकर यांचा काय संबंध?

राजेन्द्र पातोडे
प्रदेश प्रवक्ते
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!