मुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

“२६ नोव्हेंबर” संविधान दिवस;भारतीय संविधानाचे वैशिष्ठे.

१) भारतीय संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची प्रथम बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी नवी दिल्ली येथे भरली.या सभेत डॉ.राजेंद्र प्रसाद यांची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. संविधान सभेचे एकूण २९६ सदस्य होते.

२) संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड संविधान सभेने २९ ऑगस्ट १९४७ च्या सभेत केली.
मसुदा समितीमध्ये एकूण ७ सदस्य होते.(प्रत्यक्ष संविधान लिहिणारे फक्त बाबासाहेबच )

३) संविधान मसुदा ४नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत प्रस्तुत करण्यात आला.
त्या आधी जनतेच्या माहितीसाठी तो राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता. जनतेच्या सूचना व हरकती प्राप्त होण्यासाठी आठ महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.

४) संविधानाच्या मसूदा संबंधी एकंदर ७६३५ सूचना प्राप्त झाल्या होत्या.त्यापैकी २४७३ सूचनांचा विचार संविधान सभेत केला गेला.

५) भारतीय संविधाचे एकंदर ३९५ अनुबंध (कलम) आणि १२ अनुसूचीची जोड आहे. त्यातून घटनेची मूलभूत चौकट किंवा ढाचा साकार होऊन तिचा पाया रचल्या गेला.
७ व्या अनुसुचित केंद्राचे व राज्याचे कायदे करण्याचे अधिकार स्पस्ट करण्यात आले आहेत,

६) संविधान सभेत संविधानाच्या मसुद्याचे वाचन तीन वेळा करण्यात आले. त्यावर सखोल चर्चा होऊन तसेंच सूचित करण्यात आलेल्या सुधारणा किंवा बदल यांच्यावर गांभीर्याने विचार करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकृत करण्यात आले. व त्यावर संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली.

७) संविधान सभेचे कामकाज ११ सत्रांमध्ये झाले. एकंदर २ वर्ष ११ महिने १७ दिवस या सभेचे कामकाज चालले.

८) ११ वे सत्र ११४ दिवस चालले व शेवटच्या दिवशी प्रस्तावित मसुदा आवश्यक ते बदल व सुधारणा करून स्वीकृत करण्यात आला.

९) संविधानाच्या निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्र-दिवस स्वतःच्या तब्बेतीची काळजी न करता संविधान लिहिण्याचे काम केले.

१०) भारतीय संविधानाने पारंपरिक राजेशाही व राज्यपद्धती समूळ नष्ट केली.

११) स्वतंत्र, समता, बंधुत्व, समाजवाद व धर्मनिरपेक्ष तत्वांच्या पायावर उभी राहणारी लोकतांत्रिक आधुनिक गणराज्याची स्थापना संविधान निर्मितीमुळे भारतात प्रथमच आली.

१२) राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रनिष्ठा यांच्या आधारावर भारतीय संघराज्याची नोर्मिती करण्यात आली.

१३) नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व अधिकार बहाल करून त्यांच्या व्यक्तिगत सन्मानाने व जीविताचे रक्षण करण्याचे अभिवचन संविधानाने भारतीय जनतेस दिले.

१४) भारतात जनहीतकारी, कल्याणकारी व धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्था राबविली जाईल असेही अभिवचन संविधानाने देण्यात आले आहे

१५) संविधानाची मूलभूत चौकट भक्कम व अपरिवर्तनीय आहे.

१६) भारतीय संघराज्याचे स्वरूपहीं अपरिवर्तनीय ठेवण्यात आले आहे.

१७) भारतीय जनता व तिने स्वत:प्रत अर्पण केलेले संविधान सर्वोच्च म्हणून समजण्यात आले.

१८) सन १९३० पासून २६ जानेवारी हा दिवस भारतीय स्वतंत्र सेनानी यांच्या कडून दरवर्षी’ स्वराज्यदिवस म्हणून साजरा केल्या जात होता. त्यादिवसाची आठवण म्हणून
भारतीय संविधान सभेने भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी राष्ट्राला समर्पित केले.

आणि भारतात लोकशाही प्रस्थापित होऊन भारताची शासन व्यवस्था संविधानानुसार सुरु झाली.

आपले सर्वश्रेष्ठ आशास्थान – प्रेरणास्थान

भारतीय संविधान ! भारतीय संविधान !! भारतीय संविधान !!!

रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है!
_ ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है_!
औरो को जो मिला है वो मुकदर से मिला है!
हमें तो मुकदर भी तेरे संविधान से मिला है !


— संविधान दिन चिरायू होवो….26 नोव्हेंबर..!
जय भीम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!