महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

कारवाईमागे 2 मोठ्या नेत्यांचा हात. रोहित पवार

रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई झाल्याचं समोर आलं आहे. दोन राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून मनात कुठला तरी द्वेष ठेवून कंपनीच्या एक विभागावर कारवाई करण्यात आली, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो.””मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु, अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!