आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सत्ता~भागीदारी संघर्ष यात्रा(कुमकुवत ओबीसी, एस सी , एस टी , व्हीजे एन टी, मुस्लिम ओबीसी)

ऍड अविनाश टी काले , अकलूज 
मो न 9960178213

देशाच्या स्वातंत्र्याला 75वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत , भारतीय राज्य घटनेने प्रातिनिधिक लोकशाहीचे तत्व मान्य केले आहे , त्या नुसार लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात , आणि प्रौढ मतदारा द्वारे मतदान घेऊन निवडणुकीस उभे राहिलेल्या इच्छुक उमेदवारा मधून एक जण निवडून येतो व बाकीचे उमेदवार पराभूत होतात .
पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेल्या सामाजिक रूढी आणि मान्यता समाजव्यवस्थेत रुजलेली असल्याने गाव गाड्यातील “पाटील ” हेच राजकारणात सक्रिय राहिले , आणि गाव , तालुका , जिल्हा पातळीवरील सत्ता केंद्राचे ते प्रमुख ही बनले .
याच सत्तेतून त्यांनी समाज व्यवस्थेतील सर्व सत्ता केंद्र , आपल्या ताब्यात ठेवली , सहकार चळवळ , बँकिंग , शिक्षण , सहकारी सोसायटी , मार्केट कमिटी , इत्यादी ,,
केंद्रीय आणि राज्य पातळीवरील सर्व निर्णय हे त्यांच्या फायद्यासाठी राबवले गेले , यातून एक निरंतर असा सत्ता धारी वर्ग निर्माण झाला .
या सत्तेला शह देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून बहुसंख्याकांच्या धर्म अभिमानाला कुरवाळत ब्राम्हणी व्यवस्थेने सत्ता निर्मितीचे प्रयत्न चालू केले आणि सामान्य वर्गातील ओबीसी समूहातील वर्गाच्या साथीने सत्ता स्पर्धा निर्माण करताना
आपला आधार “माधव” म्हणजेच माळी धनगर वंजारी , असा बनवला आणि या हिंदुत्वाच्या प्रेरणेचा आधार म्हणून मायक्रो ओबीसी समूह वापरला गेला .
याचा थोडक्यात अर्थ असा आहे की , सुमारे 50 वर्षाच्या कालखंडात क्षत्रिय जाती समूहाची सत्ता राहिली , त्या नंतर ती धर्म सत्ता प्रभावाने प्रभावित होऊन कुमकुवत बनून ” ब्राम्हणी ” समुहा कडे वर्गीकृत झाली ,
या दोन्ही सत्तेचा आधार एस सी , एस टी , मायक्रो ओबीसी , व्हीजेएन टी , (साळी कोळी , वडार , कैकाडी , इत्यादी) मुस्लिम ओबीसी , हे राहिले ,
एस सी , एस टी वर्गाच्या राखीव जागा असल्याने या प्रवर्गा तील त्या त्या विचारसरणीच्या सोईचे लोक ” लोकप्रतिनिधी म्हणून निवडले गेले
लोकशाहीत पक्ष स्थापनेचे स्वातंत्र्य असल्याने सत्ता वंचित , व आर्थिक सामाजिक दुर्बल घटकातील अनेकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केले .
परंतु असे पक्ष हे सर्व समूहांना एकत्रित करू शकतील अश्या स्वरूपाचे राहिले नाहीत .
त्यांचे स्वरूप हे “जात मर्यादित” असेच राहिले किंवा त्या पक्षाचा कणा हा एक जात समूह राहिला .
या उलट सामाजिक आर्थिक राजकीय दृष्ट्या प्रबळ उच्च जात वर्गाने स्थापित केलेल्या पक्षाचा कणा हा तो जात समूह प्रामुख्याने राहिला असला , व सत्तेचा तोच मुख्य लाभार्थी राहिलेला असला तरी ही , इतर सर्व जाती समूहांना आपल्या सत्तेचा वाहक बनवण्यात तो यशस्वी झाला .
महाराष्ट्राच्या पातळीवर आपण सत्तेचे वर्गीकरण करताना , “मराठा सत्ता
व “मराठेतर” “ब्राम्हणी सत्ता”
अश्या दोनच सत्तेत वर्गीकरण करू शकतो .
या दोन्ही सत्ता केंद्राच्या बाहेर “आंबेडकरी”समूहाचे सत्ता केंद्र बनवण्याचे प्रयोग चालू आहेत .
महाराष्ट्रा बाहेर या विचारसरणी ला अनुसरून “बहुजन वादी” विचारसरणीचे पक्ष स्थापित झाले ,
“जीसकी जितनी संख्या भारी , उसकी उतनी भागीदारी” हे तत्त्व स्वीकारून ते पक्ष सत्ता हस्तगत करू शकले .
परंतु हे महाराष्ट्रात घडले नाही , याचे कारण , महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाचे बहुसंख्यांक हिंदू पासून झालेले धार्मिक पायावरील “अलगीकरण” यात असावे.
पण एस सी वर्गातील त्यांची लक्षणीय लोकसंख्या अस्तित्वात असल्याने निवडणुकीच्या राजकारणातील “संयुक्त मतदार संघातील” मताचे आधिक्य प्राप्त करण्यासाठी या समूहाला सोबत ठेवणे ही आवश्यक वाटल्याने यातील मोजक्या लोकांना सत्तेत भागीदारी प्राप्त करता आली , आणि अश्या सत्ता प्राप्तीसाठी आपल्या कडे मताचा गठ्ठा असावा म्हणून अनेकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली , या मुळेच आंबेडकरी समूहात अनेक पक्ष हे स्वतंत्र गट म्हणून अस्तित्वात आले असले तरी ही यातील मोजके गट हे प्रभाव शाली आहेत , आणि बाकीचे गट हे संसदीय राजकारणात दबाव गट म्हणून ही अस्तित्व राखण्याच्या स्थितीत नाहीत .
सत्ता भागीदारी मध्ये या गटाच्या प्रमुखांना सत्ता प्राप्त होण्याच्या संध्या निर्माण होतात परंतु या समाज घटकातील इतर कार्यकर्ते हे त्यांच्या हयातीत फक्त कार्यकर्ते राहतात , त्यांना सत्तचे दरवाजे उघडलेच जात नाहीत ,,,,
प्रेरणा या वरून खाली झिरपत असतात तश्या या सत्ता प्रेरणा एस सी मधील इतर जाती समूहात प्रेरित झाल्याने यातील ही कांहीं जाती नी स्वतंत्र पक्ष स्थापन करून त्याला स्व जातीचा आधार बनवला .
ओबीसी मधील मोठ्या जात समूहाने ( धनगर) समाज वगळता असे स्वतंत्र पक्ष स्थापनेचे प्रयोग केलेले नाहीत .
परंतु हे समाज सामाजिक , आर्थिक दृष्ट्या पुढारलेले असले तरीही राजकीय दृष्ट्या मागास राहिल्याने सत्ता स्पर्धा म्हणून ते “मराठा”सत्तेचे स्पर्धक राहिले , आणि याच सत्ता प्राप्ती चे आंकाक्षा तून हे समाज घटक “ब्राम्हणी” पक्षाकडे सरकले .
“शत प्रतिशत भाजपा” ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी व निरंकुश सत्ता स्थापनेसाठी 2014 पासून “केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून केंद्रीय संस्था चां प्रच्छन्न वापर करीत “*मराठा” सत्ता धारी वर्गाला टार्गेट करून भाजपने शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले .
“जे शरण येतील त्यांना अभय व सत्तेचे फायदे”
व “जे शरण येणार नाहीत त्यांच्या साठी तुरुंग वास”
अशी रचना केली ,
याच्या अतिरेकाने हे “बुमऱ्यांग” भाजप वर उलटले आणि महाराष्ट्रात लोकसभेला याचा फटका बसला .
“पण हे परिवर्तन स्थायी आहे का?”
याचे उत्तर नाही असेच आहे ,
याचे कारण आज ही या मताच्या टक्के वारीत फारसा लक्षणीय फरक नाही ,
महायुती ला 43.55% मते आहेत
तर
महा विकास आघाडी ला 43.71% मते आहेत .
आरक्षणाच्या जात लढाया
आंबेडकर वादी समूहाची सत्ता प्राप्ती साठी ची स्वतंत्र वाटचाल
आंबेडकरी समूहातील कांहीं घटकांचे महायुती कडील भागीदारी
व महा युती द्वारे निवडणूक पूर्व केलेल्या योजनाच्या घोषणा
यातून ही टक्केवारी वाढवण्याचे प्रयोग केले जाणार आहेत.
हे सारे प्रयास फोल ठरवायचे असतील तर केंद्रीय पक्ष म्हणून काँग्रेस सारख्या पक्षाने त्यांची रणनीती बदलणे आवश्यक आहे.
आपल्या पक्षाचा जनाधार काँग्रेस पक्षाने कुमकुवत ओबीसी , एस सी , एस टी , व्हीजे एन टी, मुस्लिम ओबीसी समूहातील कार्यकर्त्यांना सत्तेची भागीदारी देऊन त्यांना नेत्यांच्या रांगेत आणून त्यांच्या माध्यमातून या वर्गातील आपल्या जनाधाराचा पाया मजबूत केला पाहिजे
या वर्गातील पुरोगामी प्रवाह मजबूत करण्या साठी , व या समाज घटकातील प्रामाणिक पुरोगामी वैचारिक नेतृत्व शोधण्यासाठी , त्यांना माध्यम देण्यासाठी आम्ही या वर्गातील कांहीं प्रमुख कार्यकर्ते एकत्रित येऊन समग्र महाराष्ट्रात
सत्ता भागीदारी संघर्ष यात्रा
काढत आहोत.
ज्यात उपरोक्त घटका शिवाय आंबेडकरी चळवळीतील वैचारिक नेतृत्वा ना ही सोबत घेऊन हा वैचारिक जागर चालू राहील
या विनंती सह
आपला विश्वासू
मुख्य संयोजक
तुकाराम बाबुराव माने
माजी अभियंता सा बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!