आरोग्यविषयकमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग मध्ये पाणी प्रश्न पेटला; बोरी धरणात केवळ ८ टक्के जिवंत पाणीसाठा

नळदुर्गकरांचा दुर्लक्षपणा अन् प्रशासनाचा निष्काळजीपणा नळदुर्गकरांना भोवणा

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहराला आगामी काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नळदुर्गच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या कुरनूर प्रकल्प अर्थात बोरी धरणात सध्या केवळ ८ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासना समोर मोठे आव्हान ठरणार आहे.
बोरी धरणातून सिंचनासाठी कालव्याला सातत्याने पाणी सोडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पाण्याचा काट कसरीने वापर आणि उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन वेळेत करण्यात आले असते, तर आज निर्माण झालेली परिस्थिती काही प्रमाणात टाळता आली असती, अशी नागरिकांतुन भावना व्यक्त करताना दिसत आहेत
दरम्यान, बोरी धरणातून सिंचनासाठी होणाऱ्या अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या विशेष भरारी पथकाने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत दहा विद्युत पंप जप्त करण्यात आल्याची माहिती असून, काही ठिकाणी पाईप लाईन व केबल काढण्याची कारवाई ही करण्यात येत आहे.
मात्र, ही कारवाई धरणातून कालव्याला पाणी सोडले जात होते धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी होत होता हा साठा कमी होण्यापासून रोखता आला असता परंतू ऐवढी निर्भयता कोणात ही नाही , असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. पाणी संपत आल्यानंतर प्रशासनाला जाग का आली, असा प्रश्नही नागरिकांतून विचारला जात आहे.
“बोरी धरण उशाला, अन् कोरड पडली घशाला “
बोरी धरणात पुरेसा पाणीसाठा असताना ही नळदुर्ग शहराला साधारण दहा दिवसांच्या आड
पाणीपुरवठा केला जात होता आता धरणात केवळ आठ टक्के पाणीसाठा असून शिल्लक राहिल्याने भविष्यात नागरिकांना किती दिवसाच्या अंतराने पाणी मिळणार हा गंभीर प्रश्न नळदुर्गकरांसाठी निर्माण झाला आहे ,बोरी धरण उशाला आणि कोरड पडली घशाला या म्हणी प्रमाणे परिस्थिती नळदुर्गकरांवर ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही
पाऊसमान आणि उपलब्ध पाणी साठ्याचा आढावा घेऊन
पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असताना बोरी धरणातून तब्बल चार महिने कालव्यात पाणी सोडण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे बोरी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून कुरनूर प्रकल्प अर्थात बोरी धरण कोरडा पडण्याच्या मार्गावर असल्याची चिंता व्यक्त होत आहे
नदीकाठच्या शेतकऱ्याने वापरलेल्या विद्युत मोटारी जप्त करण्याची कारवाई सध्या सुरू आहे मात्र कालव्यात पाणी सोडल्यामुळे धरणातील साठा कमी होत असताना अशी कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल नागरिकांतून बोलला जात आहे .
दरवर्षी चांगला पाऊस पडेल या ग्रस्तिकावर पाण्याचे नियोजन करण्या ऐवजी उपलब्ध पाणीसाठा आगामी पावसाचा अंदाज आणि शहराची पिण्याच्या पाण्याची गरज यांचा विचार करून सिंचनासाठी पाणी सोडण्याची नियोजन करण्या ऐवजी होते यामध्ये पाटबंधारे विभागा बरोबर नळदुर्ग नगर परिषदेच्या संबंधित प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत सध्या बोरी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने नळदुर्ग शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रशासनाचे मोठे होऊन बनले आहे नागरिकांचा दुर्लक्षपणा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा याचा फटका आगामी काळात नळदुर्गकरांना बसण्याची दाट शक्यता असून पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात असे नागरिकांतून बोलले जात आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!