एकीकडे हनुमान चालीशे , दुसरीकडे विराट धर्म संमेलन , तिसरीकडे हिंदी कथावाचक धुमाकूळ घालायलेत.
हे प्रामुख्याने शहरी भागात आहे.
मग ग्रामीण भागाला पण काहीतरी मॉडेल पाहिजे ना ?
गावखेड्यात वेगळा खेळ सुरु केलेला आहे.
यांच्याच दोन गटांनी खेळ खेळायचा.
एकाने महापुरुषांचा पीओपी किंवा फायबर पुतळा आणायचा , रात्रीतून गावाच्या मोक्याच्या ठिकाणी किंवा चौकात बसवायचा.
दुसर्यांनी त्याला विरोध करायचा किंवा पुतळ्याची विटंबना झाली अशी आवई उठवायची.
मग कोर्टकज्जे , हाणामारी , पोलीस आणि ध्रुवीकरण.
हे सगळ कशासाठी ?
बंद पडलेल्या शाळा ,
बंद पडलेले सरकारी दवाखाने ,
बंद पडलेली एसटी ,
शेतमाल भावाची अवस्था,
कर्जबाजारी शेतकरी,
वाढलेली बेरोजगारी ,
बुडणाऱ्या बँका ,
एप स्टीन , राफेल सारखे घोटाळे,
विकून खालेल्ला देश,
या सगळ्या मुलभूत प्रश्नावर कुणीही आवाज उठवू नये यासाठी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना दिलेली सुपारी वाजवायला रोज काहीतरी मसाला पाहिजे तो पुरवायला हे खेळ सुरु आहेत.
ज्यांना या महापुरुषांचा आदर आहे त्यांनी तो आदर कृतीत आणायला सोप्प काम कराव.
पुतळ्याचे पैसे गावातली शाळा दुरुस्त करायला, वाचनालयात पुस्तक आणायला , डिजिटल क्लासरूम साठी खर्च करावेत.
अरे बापरे !!
मग पोर शिकायला लागली , वाचायला लागली तर भलताच घोटाळा होईल.
शिकलेले प्रश्न विचारायला लागले तर काय करायचं ?
म्हणून सतत मेंदू गुंतवून ठेवायला , विचारशक्ती नष्ट करायला आणि भ्रमित करायला हे अस्मितांचे खेळ रंगवले जाताहेत आणि या माध्यमातून लोकांना सतत गुंगवून ठेवल जात आहे.
महाराष्ट्राचे सत्व आणि अस्तित्व कायमच नष्ट करून महाराष्ट्र गोबरपट्टा बनवण्याचा हा खेळ आहे.
आणि बहुजनांनी आम्हाला वापरल छापाचे गळे अजिबात काढू नयेत.
आपल्या डोक्यात मेंदूच्या निर्वात पोकळीत शेण भरलेलं आहे हे असल्या कटाला बळी पडून आपण वारंवार सिद्ध करतो आहोत.
हे आहे अस आहे.
आनंद शितोळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



