महाराष्ट्रमुख्यपान

“महाराष्ट्रातलं मंत्रालय हे आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध, सरकार मात्र जाळ्या लावण्यात मग्न”, काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांची टीका.

महाराष्ट्र सरकारचं कामकाज ज्या मंत्रालयातून चालतं त्या मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारत एका तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र जाळी लावली असल्याने त्या तरुणाचे प्राण वाचले. याच घटनेचा संदर्भ देत काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी भली मोठी X पोस्ट (ट्विटर) महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. तसंच महाराष्ट्र सरकार आत्महत्या रोखण्याऐवजी जाळ्या लावण्यात मग्न आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र सरकारचं मुख्यालय म्हणजे मंत्रालय. महराष्ट्रात हे ठिकाण आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक येतात आणि सरकारच्या धोरणांना कंटाळून इमारतीच्या टेरेसवरुन किंवा सातव्या मजल्यावरुन उडी मारुन जीव देतात. अशा घटनांमध्ये अनेक लोकांचा जीव गेला आहे. सरकार मात्र आत्महत्या रोखण्याऐवजी मंत्रालयात जाळ्या लावण्यात मग्न आहे. जाळी लावण्यात आल्याने कुणी उडी मारली तरीही ती व्यक्ती त्यात अडकते आणि त्याचा जीव वाचतो. मंगळवारीही एका युवकाने मंत्रालयातून उडी मारली. मात्र तो या जाळीत अडकला आणि त्याचा जीव वाचला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!