देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

केंद्र सरकारच्या चुकीमुळे

१) केंद्र सरकारच्या चुकीमुळे पुलवामा मध्ये ४० जवान शहीद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देश हळहळत होता. मात्र तत्कालीन ट्विटरवर एका शहीदाच्या पत्नीला सत्ताधारी आयटी सेल देशद्रोही ठरवत होता. कारण तीने घटनेचे राजकारण करु नका म्हणून सुनावले. पुढे त्याच शहीदांचे बॅनर लावून सत्ताधारी पक्षाने मते मागितली. आजतागायत पुलवामा तपास जनतेसमोर आला नाही!

२) पश्चिम बंगाल राज्यात पूल कोसळल्याने २५ नागरीकांचा दुर्दैवी अंत झाला. तेव्हा दुर्घटनेचे राजकारण करु नका म्हणणारे पंतप्रधान पश्चिम बंगाल सरकारला दोष देत सदर घटनेला ‘अ‍ॅक्ट ऑफ गाॅड नहीं, अ‍ॅक्ट ऑफ फ्राॅड’ म्हणत मृतांच्या नावाने मते मागत पश्चिम बंगाल मध्ये प्रचारसभा घेत फिरत होते. निवडणूक झाल्यानंतर अ‍ॅक्ट ऑफ फ्राॅड ची चौकशी जनतेसमोर आली नाही!

३) गुजरात सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरात राज्यातील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील पूल तुटल्यामुळे ६० लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा देखील दुर्घटनेचे राजकारण करु नका म्हणणारे पंतप्रधान स्वतः संपूर्ण गुजरात राज्यात प्रचारसभा घेत फिरत होते. ६० मृतांच्या नावाने मते मागितली. आजतागायत तपास जनतेसमोर आला नाही!

४) केंद्र सरकारच्या चुकीमुळे ओडीसाच्या बालासोर मधे रेल्वे दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २५० लोक मृत्युमुखी पडले. सरकारने दोषींवर कारवाई करण्याऐवजी दुर्घटना मुस्लीमांनी घडवल्याचा खोटा प्रचार केला. आजतागायत तपास जनतेसमोर आला नाही!

५) महायुती सरकारच्या गलथानपणामुळे राज्यातील घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग कोसळल्यामुळे १४ निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. नंतर पंतप्रधानांचा मुंबईत रोड शो आणि प्रचारसभा पार पडली. दोषींवरील कारवाई जनतेसमोर आलेली नाही. राज्यातील अनधिकृत होर्डिंगचे ऑडीट होवून कारवाई झालेली नाही!

या ५ घटना केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या पाचही घटनांमध्ये जबाबदार मंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत राजीनामे दिले नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. मुळात अधिकाऱ्यांवर कारवाई तेव्हाच होते जेव्हा ते बरबटलेले नसतात. इथे शिपायापासून मंत्र्यापर्यंत ‘सगल्यानी मिलून खायचा’ मग कारवाई कोणावर होणार?

असो. असे संदर्भ दिले किंवा दुर्घटनेची, आतंकवादी हल्ल्या होतो तेव्हाच्या सुरक्षा यंत्रणेच्या गलथानपणाची जबाबदारी कोण स्विकारणार? असा प्रश्न विचारणारा असंवेदनशील किंवा राजकारण करणारा ठरवला जातो.

आपली संवेदनशीलता फक्त सिलेक्टिव्ह घटनांमध्ये उतू जाते. कोणीतरी लिहून ठेवलेय की, ‘गिधाडांना खुश होण्यासाठी रक्तामांसाचा चिखल आवश्यक असतो.’ हे तंतोतंत खरं आहे!!

  • तुषार गायकवाड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!