१२ मे-भगवान गौतम बुद्ध जयंती

युद्ध टाळा अन् मानवजातीचा उद्धार करा
बौद्ध धर्माचे संस्थापक एवं साऱ्या विश्वाचे शांतीदुत भगवान गौतम बुद्ध यांना जयंती (बुद्ध पौर्णिमा) दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली अन दंडवत प्रणाम! 💐🙏
“युद्धाने कुठलाही प्रश्न सुटत नाही,यास्तव युद्धापासुन सर्वांनी दूर रहावे.कारण एका युद्धातून दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातात आणि त्यातून मानवजातीचा संहारच होतो”,असा मोलाचा उपदेश गौतम बुद्धांनी साऱ्या जगताला दिला.या पार्श्वभूमीवर “युद्ध टाळा अन् मानवजातीचा उद्धार करा”,असे भावनिक आवाहन बुद्धांनी जगातील राज्यकर्त्यांना केलं.
गौतम बुद्ध आपल्या जनसंदेशात म्हणतात,”मानवी जीवनात सद्गुणांचे वर्धन करण्यासाठी स्वार्थी व अपप्रवृत्तींचा त्याग करावा.कोणाच्याही जीवाला इजा,दुःख-यातना देऊ नये”.गौतम बुद्धांच्या सत्य व अहिंसा या तत्वांना आत्मसात करून द्वेष,हाव-आसक्तीला मूठमाती द्यावी.आपल्यापाशी जी काही धनराशी आहे,त्यातील काही भाग गोरगरीब,निर्धन लोकांना दान म्हणून अर्पण करावी.यालाच खऱ्या अर्थाने सत्कर्म म्हणतात,हा संदेश त्यांनी अखिल मानवजातीला दिला.बुद्धांनी मानवातील सर्व अपप्रवृतींचे निराकरण करण्यासाठी सर्वसंतू
निरामया हा विचार आत्मसात करा,असा मंत्र दिला.सर्व लोक हे माझे बांधव आहेत,ही भावना लोकांच्या मनात रूजवावी,हा त्यांचा प्रांजळ उद्देश होता.
गौतम बुद्धांचा जन्म इ.स.पू.६३२ मध्ये लुंबिनी (नेपाळ) येथे क्षत्रिय राजघराण्यात झाला,अन् जणू काही विश्वाला अहिंसेचा संदेश देणारा शांतीदुत पृथ्वीवर अवतरला.बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोदन तर,आईचे नाव राणी महामाया.परंतु दुर्दैवाने राणी महामाया यांचे सिद्धार्थच्या जन्मानंतर अवघ्या सातच दिवसात देहावसान झाले.त्यानंतर महाप्रजावती गौतमी नामक त्यांच्या सावत्र आईने सिद्धार्थचे संगोपन
केलं.या पार्श्वभूमीवर त्यांना गौतम असे संबोधिले जाते.
सिद्धार्थ गौतमच्या गुरूंचे नाव सब्बमित्त होते.वयाच्या ८ व्या वर्षांपासूनच त्यांच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली होती.ते भाषाशास्त्र,व्याकरणशास्त्र, वेद,वेदांगे,
उपनिषदे यात पारंगत होते.वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह शाक्य घराण्यातील राजा दंडपाणि यांची कन्या राजकुमारी यशोधराशी झाला.कालांतराने शाक्य व कोलिया या दोन राज्यांमध्ये रोहिणी नदीतील पाणी वाटपावरून झालेल्या वादाचे पर्यवसान युद्धात होऊन मोठा रक्तपात झाला.त्यामुळे राजपुत्र गौतम बुद्ध यांचे मन उद्विग्न झाले अन् त्यांनी राजपाटाचा त्याग करून रानावनात निघून गेले. त्यानंतर त्यांनी विश्वाला युद्धाचा मार्ग त्यागून शांती व अहिंसेचा मार्ग स्वीकारावा,या उद्देशाने बौद्ध धर्माची स्थापना केली.बिहारमधील गया जिल्ह्याला बौद्ध धर्मा संदर्भात अनन्यसाधारण महत्व आहे.तेथे अवस्थित महाबोधी मंदिरात स्थापित बुद्ध मंदिराच्या मागे एक भले मोठे पिंपळाचे वृक्ष आहे. असं म्हटलं जातं की,सदर पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती.यास्तव हे झाड बोधीवृक्ष म्हणून ओळखले जाते.ह्याच मंदिरात भगवान बुद्धांची मूर्ती पदमासन मुद्रेत ध्यानस्थ बसल्याचे प्रतिबिंबित होते. तात्पर्य,गौतम बुद्ध हे खऱ्या अर्थानं मानवतावादी सत्पुरुष होते.
आज सारं जग महान-मोठ्या युद्धांच्या दहशतीच्या वातावरणात वावरत आहे.कुख्यात आतंकवाद्यांना आसरा देणारे पाकिस्तानसारखे देश
अणूबॉम्ब टाकण्याचा इशारा देताहेत.असं हे अस्थिर अन् दहशतीचे वातावरण वैश्विक स्तरावर पसरलेलं दिसते.या पार्श्वभूमीवर भगवान गौतम बुद्धांच्या अहिंसा मार्गाचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे.हा विधायक मार्ग स्वीकारल्याने अखिल जातीचे रक्षण होऊन विश्वात शांतता,बंधुभाव व सौख्य प्रस्थापित होण्यास मदत होईल.चला तर,आपण सर्वजण बुद्धांच्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा अंगिकार करून अखिल मानवजातीला सुखी,आनंदी तथा तणावमुक्त जीवन प्रदान करण्यास कटिबद्ध होऊया.थोर
युगपुरुष भगवान गौतम बुद्धांना आमचा दंडवत प्रणाम!💐🙏
बुद्धं शरणं गच्छामी!
✍️ पत्रकार रणवीर राजपूत,निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,माहिती व जनसंपर्क,मंत्रालय
(मो.न.९९२०६७४२१९)
………………………………..
प्रिय संपादक महोदय,
कृपया आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात वरील लेख १२ मे च्या अंकात प्रसिद्ध करावा,ही नम्र विनंती.🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत