महाबोधी बोधगयेचा लढा नेटाने लढू!

ते जे कुणी असतील,दंगल, जाळपोळ घडवतील, आपण महाबोधी बोधगयेचा लढा नेटाने लढू! ———————-विशाल हिवाळे-
जगातील असंख्य देश, ग्रहताऱ्यांवर, अवकाशात वस्ती करण्याच्या स्पर्धा करत आहेत.आपल्या देशातील धर्मांध मातीत गाडलेल्या कबरीवर विचार करत आहेत.(संदर्भ-नागपूरची दंगल).नऊ महिन्यानंतर ते अवकाशातून सुनिता विल्यमस व तिच्या साथीदारास पृथ्वीवर ताशी २७,००० किमी वेगाने उदया परत आणतील, वैज्ञानिक क्षेत्रात एक दमदार पाऊल टाकल्याचा जल्लोष करतील.या देशातील धर्मांध दंगली घडवतील, दोन्ही गटातील माणसं मारतील.मेलेल्यांच्या मढयांचं पुन्हा राजकारण करत बसतील.भळभळणाऱ्या जख्मा घेऊन पूर्ण आयुष्य जगताना आपल्या वारसांना हिंसेची शिकवण देतील.जगातले संशोधक मोबाईलला लागणाऱ्या नेटला, पृथ्वीभोवती कृत्रिम ताऱ्यांचं जाळं तयार करून, सॅटेलाईट द्वारे अति जलद नेट पुरवतील.आपल्या देशातले धर्मांध जगात झालेल्या संशोधनाचा एक कण मिळावा म्हणून त्यांच्याशी करार करतील.दुसऱ्यांच्या संशोधनावर जगू पाहणाऱ्या मानसिकतेचे हेच लोक जाळपोळी घडवून जे काही उभं राहतंय त्यास उद्ध्वस्त करून,देशाच्या संपत्तीची राखरांगोळी करतील. तिकडे २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर १ लाख लोकांची वसाहत निर्माण करण्याचं संशोधन युद्धपातळीवर सुरू असताना आपल्या देशातील धर्मांध २०३० पर्यंत वैज्ञानिक दृष्टीकोन देणारं व मानवी मूल्य प्रदान करणारं भारताचं संविधान बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील.अंद्धश्रद्धा,चमत्कार, जादूटोणा, अघोरी विद्येचा नंगानाच घडवतील.
तिकडे अफगाणिस्तानातील कडवे मुस्लिम पहिले वैज्ञानिक,प्रेम,करूणा, शांती, मैत्री, आणि अहिंसेचे जनक तथागत, भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची पुन्हा डागडूजी करून त्या मार्गाने निघाले आहेत. ईकडे आपल्या देशातील धर्मांध, बुद्धाच्या जन्म व कर्म भूमित बोधगयेचा अनधिकृत ताबा सोडणार नाहीत.म्हणूनच बौद्धांना आवाहन करतो, ते जे कूणी जाळपोळ,दंगल घडवून संभ्रम व मुख्य विषयावरून लक्ष विचलीत करणारे मास्टर माईंड सुत्रधार असतील,दिशाहीन होऊन व धर्मांध होऊन बहुजन अथवा अल्पसंख्यांक या कटात सहभागी होतील,या संघर्षात बहुजन व अल्पसंख्यांक तरूण नाहक बळी जातील.मात्र, आपण त्यांच्या षडयंत्राला बळी पडायचं नाही. ते दंगली घडवून बहूजन आणि अल्पसंख्यांक माणसं मारण्याचे उद्योग करतील.जाळपोळ घडवून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करतील.बौद्ध शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटत असतानाच आपलं महाबोधी बोधगयेचं आंदोलन अधिक व्यापक करून नेटाने लढतील.त्याच बरोबर महाराष्ट्रातील महायुतीने हूकूमशाही प्रस्थापित करणारा व लोकशाही मूल्ये संपुष्टात आणणारा जो “जनसुराज्य अधिनियम” कायदा आणलाय त्यास प्रखर विरोध करतील.त्या कायद्याच्या विरोधात प्रबोधन व जनजागृती करून, हरकती नोंदवतील.अंतिमत: हा कायदा रद्द करण्याची मागणी करतील.
प्रतिक्रांती प्रस्थापित करणाऱ्या विकृतांना जोरदार ठोसा देऊन, पुन्हा क्रांतीचं सातत्य ठेवणारा महाबोधी बोधगयेच्या मुक्तीचा लढा हा अंतिम लढा आहे. आता हा लढा जिंकल्या शिवाय थांबवता येणार नाही.कारण हजारो वर्षांनंतर पुन्हा बुद्धाचा व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आधूनिक विचारच यांचा पराभव करणार आहे.
–विशाल हिवाळे
(संविधान अभ्यासक आणि प्रचारक)9022488113*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत