
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हर्च्युअल जी-20 शिखर परिषद होणार आहे. अडीच महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री दुसऱ्यांदा जी-20 नेत्यांच्या परिषदेचं यजमानपद भूषवणार असल्याचं जी-20 चे शेर्पा अमिताभ कांत यांनी शिखर परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत सांगितलं. यातून भारताची ताकद आणि जागतिक स्तरावर मोदी याचं नेतृत्व दिसून येत असं ते म्हणाले.
या आभासी शिखर परिषदेत, नवी दिल्लीत सप्टेंबरमधे झालेल्या शिखर परिषदेचं महत्त्व, निवडक निकाल, आणि कृती बिंदू, तसंच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्या होणाऱ्या आभासी शिखर परिषदेत जी-20 मधील बहुसंख्य नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. भारताकडे ३० नोव्हेंबरपर्यंत जी-20 चे अध्यक्षपद आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत