हिंदू धर्मातील महारांची दिवाळी

एकवेळ कुत्र्याच्या शेपटीला सरळ करता येईल पण तथाकथित बौद्ध म्हणणाऱ्या महारांच्या खोपडीतून हिंदू धर्मातील सण उत्सव कधीच जाणार नाही. हेच ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी, गद्दार ! डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट शब्दात हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करू नये असा ठराव १९३६ ला महार परिषदेत पास केला होता. आज ८८ वर्षं पूर्ण होऊन तरीही ह्या महारांच्या खोपडीतून हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची हौस गेली नाही. आणि हे सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या परिश्रमातून ह्यांच्या खिशात बऱ्यापैकी पैसा आहे म्हणून हे उतमाज करीत आहेत. जेंव्हा जेंव्हा हिंदू धर्मातील सण उत्सव येतात तेंव्हा तेंव्हा ह्यांच्या जिभेला उत येतो आणि असले नसले कपोलकल्पित मनगढंत पुरावे देऊन, अरे ! हा तर बौद्धांचाच सण उत्सव आहे असे म्हणून हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवतात. असे समाजातील काही निर्बुद्धीजीवी बेंबीच्या देठापासून समाज माध्यमातून रकाने चे रकाने भरून लेख टाकतात.
परिषदेमध्ये पास झालेले ठराव
*ठराव १ ला *(अ)*
मुंबई इलाख्यातील महार जातीची ही परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते की, महार जातीला समाजात समता, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच उपाय आहे. ही परिषद आमचे एकमेव परमपूज्य पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.
(ब) पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजाअर्चा करू नये. हिंदूंचे सण, व्रत वैकल्ये, उपोषणे, वगैरे पाळू नयेत हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये. तीर्थाटने वाऱ्या वगैरे करू नयेत, अशी या परिषदेची महार जातीला सूचना आहे. संदर्भ — खंड १८ भाग १ पृष्ठ क्र ४९०
आज त्या ठरावाला ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही ह्या महारांना हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची हौस गेली नाही. असे हे बौद्ध म्हणणारी गद्दार आहेत. हिंदू धर्मातील कोणताही सण उत्सव येवो, मग रंगपंचमी असो, नागपंचमी असो की बैलपोळा असो, हा बौद्धांचाच सण आहे अशी आरोळी ठोकतात. त्यामुळे समाजात संभ्रमावस्था निर्माण होते.
आपल्या पूर्वजांना एकवेळ धड अन्न खायला मिळत नव्हते, म्हणून मेलेल्या ढोरांचे मास कापून उन्हामध्ये सुकविण्यासाठी ठेवत असत. अंगावर चिथडे स्वरूपात फाटके कपडे असायचे ज्यामध्ये पांढऱ्या उवा पूर्ण शिलाई मध्ये असायच्या. अशा परिस्थितीत आपण हिंदू धर्मातील सण उत्सव साजरे करीत असेल काय ?
महार समाजाची त्यावेळी काय अवस्था होती त्याबाबत डॉ बाबासाहेब काय म्हणतात ते पाहा बयताडांनो —
तुमची खरी स्थिती काय आहे याची तुमच्याच हाडामासाच्या मला पूर्ण जाणीव आहे. आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार. अंगावर एखादा फाटका सदरा व एक लंगोटी. ती देखील लवकर बदलता येत नाही अशी तुमची कंगाल स्थिती. संदर्भ — १८ भाग १ पृष्ठ क्र ४५३ पैरा १
ह्या अवस्थेत आपण हिंदू धर्मातील सण उत्सव कसे साजरे करीत असू ? खायला पोटभर अन्न नसेल तरीही फटाके फोडत असणार काय ? डोक्याला तेल लावाची सोय नव्हती, भाजीमध्ये पुरेसे खाण्याचे तेल मिळत नव्हते तरीही तेलाचे दिवे लावून दिवाळी साजरी करीत असेल काय ? पण म्हणतात ना, संपत्ती मारवाड्यांनी हजम करावी महारांना पचनी पडत नाही. “घरात नाही दाणा आणि महार चाले उताणा” आता जरी तशी आर्थिक परिस्थिती नसली, आणि हे सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या परिश्रमाने आणि त्यागाने मिळाले आहे, तरी हिंदू धर्मातील सण उत्सव साजरा करण्याची मानसिकता आहे बौद्धांची !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत