देशदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

सगळीकडे ‘ब्राम्हण’ असणे हा “योगायोग” आहे की लॉबिंग….❓

सगळीकडे ‘ब्राम्हण’ असणे हा “योगायोग” आहे की लॉबिंग….❓
ब्राह्मणी वर्चस्ववाद आणि बहुजनांची उदासीनता म्हणायची…❓
✍🏻- आंनद शेटे,बागणी,जि. सांगली.
(मो. न.9403782347)


 *कितीतरी अशा संघटना आहेत ज्याचे प्रमुख 'ब्राह्मण' आणि कार्यकर्ते बहुजन आहेत. एखादी अशी संघटना सांगा, ज्याचा प्रमुख बहुजन आणि कार्यकर्ते ब्राह्मण असतील. एक सुद्धा सापडणार नाही. असं का...❓ याचं उत्तर बहुजन तरुणांनी शोधलं पाहिजे....*
*राष्ट्रीय पक्षांचे अध्यक्ष ब्राह्मण,कॅबिनेट सचिव ब्राह्मण, उच्च न्यायालयातील न्यायाधीश ब्राह्मण, मीडियाचे मालक ब्राह्मण, वरिष्ठ पोलीस अधिकारी ब्राह्मण, टीव्हीवर गायक ब्राह्मण, वादक ब्राह्मण, नट नट्या ब्राह्मण, दिग्दर्शक ब्राह्मण एवढंच काय तृतीयपंथीयांच्या संघटनेचा अध्यक्ष सुद्धा ब्राह्मणच...!*

अरेच्या, काय चाललंय हे….‼️🤔😳😨

आमची बहुजन मंडळी मेली की काय…❓🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
सगळीकडे ब्राह्मण असणे हा योगायोग आहे की लॉबिंग…?

बरं यांची संख्या किती तर अवघी 3%,मग सगळीकडे प्रमुख ठिकाणी यांचीच वर्णी कशी…? प्रत्येक क्षेत्रात यांचेच वर्चस्व कसे…?

आता काही अतिशहाणे म्हणतील की, ते त्यांच्या बुद्धिमत्तेने पुढे गेले…? असं बिलकुल नाही. साफ चूक.

त्यांची रेषा मोठी दाखवण्यासाठी इतरांची रेषा त्यांनी पुसून टाकली. बहुजनांना सगळ्यापासून वंचित ठेवलं. जाईल तिथे लॉबिंग करून ब्राह्मणेतरांना बाहेर ठेवलं.

साधं उदाहरण आहे—
महिलांनी घरातून बाहेर पडायचं नाही असली पुराणवाणगी यांनीच शिकवली.शिकवली म्हणण्या पेक्षा लादली आणि यांच्या महिलांना कला,क्रीडा, संगीत, गायन, वादन यात पुढं आणलं का…? बहुजन महिलांना गायला गळा नव्हता की कलेची जाण नव्हती?

समुद्र ओलंडायचा नाही हे यांनीच सांगितलं आणि सगळ्यात जास्त परदेशात हेच गेले.

उत्तम शेती कनिष्ठ नोकरी हे समाजावर बिंबवलं पण यांनी कधीच शेती केली नाही. तोट्याची शेती आम्हाला शिकवली आणि अधिकारपदी नोकऱ्या यांनी केल्या.

मातृभाषेतून शिक्षण सुकर असताना मुद्दामहून आधी संस्कृत आणि आता इंग्रजी लादलं.आतातर शाळाच बंद करायचा घाट घातलाय.ना रहेगा बास ना बजेगी बासरी. बहुजन शिकलाच नाही तर पुढे यायचा आणि यांच्याशी बरोबरी करायचा प्रश्नच येत नाही.

हे सगळं लॉबिंग करून, बहुजनांना आर्थिक, शैक्षणिक मागास ठेऊन आपलेच वर्चस्व ठेवायचे व पुन्हा एकदा ब्राह्मणी व्यवस्था आणून सगळा देश गिळंकृत करण्याचा कावा आहे. पुन्हा एकदा चातुवर्णाची उतरंड राबवण्याचा अजेंडा RSS च्या माध्यमातून राबवला जातोय, त्यालाच हिंदूराष्ट्र असं गोंडस नाव दिलं आहे. स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांनी विचार करावा की आत्ता लोकशाही असताना या देशातील व्यवस्थे मध्ये, निर्णय प्रक्रियेत ही ब्राह्मण लॉबी बहुजन तरुणांना वरच्या पदापर्यंत येऊ देईना मग यांच्या मनूच्या कायद्याने चालणाऱ्या हिंदूराष्ट्रात बहुजनांची अवस्था काय असेल? ह्याची जरा कल्पना असू द्यावी.

हिंदूराष्ट्र म्हणजे निव्वळ ब्राह्मणी वर्चस्व असलेलं राष्ट्र हे डोक्यात घुसवून घ्या आणि ध्यानात ठेवा.

मुस्लिम विरुद्ध हिंदू भडकावून दोघांनाही असुरक्षित वाटावं आणि हिंदूंना हिंदूराष्ट्र व मुस्लिमांना मुस्लिमराष्ट्र या संकल्पना सुरक्षित वाटव्यात अशी सगळी राजकीय खेळी RSS खेळत आहे.पण आपण भारतीय आहोत यावर हिंदू,मुस्लिम, सर्वच जातीधर्मियांनी ठाम राहून देशाला पोखरू पाहणाऱ्या प्रवृत्तीला आपल्या एकीतून विरोध दर्शवला पाहिजे. त्यांची एकी हे त्यांचे शक्तीस्थान नाही तर आपली दुही हे त्यांचे शक्तीस्थान आहे.
बहुजन तरुणांनी आतातरी डोळे उघडावेत. सगळी सत्तासूत्रे हातात असणारे ब्राह्मण शिक्षणामुळे आपल्यावर राज्य करतायत. त्यांचं ज्ञान आणि आपलं अज्ञान आपल्याला नडतंय. म्हणून आपणही शिक्षणाची वाट धरली पाहिजे.

गणेशोत्सव, दहीहंडी, नेत्यांचा प्रचार यात कधी ब्राह्मण मुले दिसली का…? दिसणार पण नाहीत. तुम्हाला मात्र नक्की अडकवणार, तुम्हीही हसत हसत अडकणार, कारण तुम्हाला मार्ग दाखवणाऱ्या महापुरुषांच्या विचारांच्या मशाली तुम्ही विझवून टाकल्या.सनातन्यांनी महापुरुषांच्या शरीराचा खून केला तर भटाळलेल्या बहुजनांनी महापुरुषांच्या विचारांचा खून केला.
अजूनही जागे व्हा,समस्याच्या मुळाशी जा,आपलं अज्ञान हे आपल्या समस्याचं मूळ आहे. आपल्या अज्ञानाचा फायदा घेत सनातन्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले. हेच वर्चस्व मोडीत काढण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर,म. बसवण्णा, छ.शिवराय, छ. शंभूराजे, संत तुकाराम, गाडगेबाबा, म. फुले, छ. शाहू महाराज, संत कबीर, प्रबोधनकार, बाबासाहेब अशी कित्येक नावे सांगता येतील ज्यांनी आयुष्य वेचले. कित्येक मारले गेले, कित्येकांना मरणानंतरही अवहेलना सहन करावी लागली, हे कोणासाठी…? तुमच्या आमच्यासाठीच ना…!
मग त्यांचा त्याग आम्ही कसे काय विसरू शकतो..?

आमच्या बहुजन तरुणांचे विचार, बुद्धी नको तिथे अडकवून त्यांचे आयुष्य उद्धस्त केलं जातंय. देव, धर्म, कर्मकांड, धर्मद्वेष यातून बाहेर पडा. विज्ञानवादी, मानवतावादी बना.

अध्यात्म सोडलं तर कोणतंही तत्वज्ञान भीती घालत नाही.

या भीतीची चिकित्सा करा. भीती घालणारी गोष्ट मानवाच्या हिताची कशी असेल, हा साधा प्रश्न स्वतःला विचारा.
उत्तरादाखल एक नवीन विचार उदयास येईल, जो आयुष्याला दिशा देईल.👍

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!