हिंगोली मध्ये विद्यार्थ्याच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन.

सुशिक्षित बेरोजगार कृती समिती हिंगोलीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तर कंत्राटी भरतीचा जीआरही जिल्हा कचेरीसमोर जाळून त्याचा निषेध नोंदविण्यात आला.राज्य सरकारने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीमध्ये सामाजिक आरक्षण ठेवले नाही, ही कृतीच मुळात असंवैधानिक असल्याचा आरोप केला. यात एससी, एसटी, ओबीसी व्हीजेएनटी, एसबीसी, अपंग, महिला, आरक्षण नाकारले आहे का ? प्रश्न उपस्थित होत आहे.अ ब क आणी ड संवर्गातील या जागा असून इतक्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद भरती होणार असेल तर यामागे गौडबंगाल असल्याचा आरोपही केला. संविधान कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली मोर्चा काढलेला आहे.
कुठल्याही भरती प्रक्रियेत परीक्षेची फिस हजार ते बाराशे रुपये ठेवली जात आहे. ती शासनाने कमी करावी आणि नोकऱ्यांचा खाजगीकरणाचा जीआर रद्द करावा अन्यथा आणखी उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत