आणि राग आला बौद्धांना

संभाजी महाराज बद्दल बामणांनी अनऐतिहासिक बदनामीकारक बोलले आणि राग आला बौद्धांना. अर्थात आपण समतावादी आहोत आणि मानवतावादी व्यक्तीमत्व सर्वाचे आहे त्याबद्दल वाद नाही. पण जे मराठे भावडे महाराजांच्या अस्मितेवर अभिमान बाळगतात ते शांत बसतात. मग ते प्रकरण छिंदम असो की मागे बापटाने बनावटी पुतळा बांधुन तो पाडलेला असो की आता कोकटकर प्रकरण असो. विशेष म्हणजे महाराजांच्या आदरापोटी तुम्ही घेतलेल्या भुमिकेला ते घंटा गिनत नाही. सैराट चित्रपट एक काल्पनिक आणि सरंजामी जातीव्यवस्थेला अधोरेखित करणारा होता पण तरीही आजही मराठा तरुण नागराज मंजुळे बद्दल कमरेच्या खाली शिव्या देऊन बोलतात. आणि हेच मराठे जे बामण महापुरुषाचं नाव घेऊन थेट बोलत असताना एकाचंही रक्त सळसळत नाही. आणि हे ऐकुन शांत बसले असं पण नाही. हे मावळे १०-१५ हजार संख्येने भिडेच्या नेतृत्वाखाली महाडला वीरेश्वर आता पंधरा दिवसांपूर्वी गेले होते. हे तेच वीरेश्वर मंदिर आहे जिथे महाडच्या चवदार तळे सत्याग्रह वेळी सत्याग्रह करणाऱ्यावर हल्ला झाला होता. वीरेश्वर मंदिर काही ऐतिहासिक नाही, यावर्षी अचानक १०-१५ हजार तरुण भिडे तिथे कसा घेऊन गेला? का घेऊन गेला? हे बघितलं पाहिजे. एवढी मोठी लोकसंख्या mobilised झाली कशी? मोठी सभा नाही मोठी घोषणा नाही कुठे बॅनर नाही !! अंडरग्राऊंड सुप्त पद्धतीने १५ हजार लोक mobilised होत असेल तर ती यंत्रणा किती मोठी व शिस्तबद्ध आहे याचा अंदाज येतो.
इकडे स्वताला जागृत आंबेडकरवादी समजणाऱ्यांना चर्चेसाठी सुद्धा वेळ नसतो. एवढ्या मोठ्या संख्येने व अंडरग्राऊंड कधी काम करतील हे तर शक्यच नाही. नुसती उदास मानसिकता आहे. स्वताचा कोणता नॅरेटीव नाही कोणता डिस्कोर्स नाही. याला प्रतिक्रिया दे त्याला प्रतिक्रिया दे, याला डिफेंन्ड त्याला डिफेंड बस एवढं करा आणि परत बोंबलत फिरायचं की एकत्र का येत नाही. एक एक दिवस हातातुन निसटत चालला, आपण उघड्या डोळ्यांनी बघ्यांच्या भुमिकेत आहे. दरवर्षी फक्त जयंती स्वरूप मोठं होत आहे पण चळवळ व विचारधारा व्यापक सक्रीय होण्या ऐवजी संकुचित होत आहे यावर मात्र कोणाचं लक्ष नाही. बामण आपल्या ५० वर्ष पुढे विचार करत आहे आणि आपण मागच्या ७५ वर्षाच्या टाईम झोन मधे बसुन xyxy करत आहोत. धोक्याची जाणिव का होत नाही? का वाटत नाही आपल्याला की सगळं बिघडत चाललं, सगळं संपत चाललं? त्याग तर लैय मोठी गोष्ट झाली पण आपण चर्चेसाठी साधा टाईम म्यानेज करु शकत नाही. चळवळ व विचारधारा automode वर ठेऊन आपण आपलं अस्तित्व नाही टिकवु शकणार… कधीच नाही. हे कळणार कधी.
वेळीच सावध व्हा, तुम्ही जेवढं समजता तेवढा वेळ तुमच्या हातात नाही.
Rahul Pagare
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत