
भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात विश्वचषकापूर्वी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यातील पहिला सामना आज २२ सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जात आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये या विश्वचषकाच्या दृष्टीने खेळाडूं अजमावण्याची संधीदेखील आहे. या मालिकेसाठी भारताकडून दोन विविध संघ जाहीर करण्यात आले आहेत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय समान्यचची नाणेफेक झाली आहे. भारताने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरुवात करणार आहे. भारतीय वनडे संघामध्ये आर अश्विनचे पुनरागमन झाले आहे. त्याचसोबत ऋतुराज गायकवाडला शुभमन गिलसोबत सलामी देण्याची संधी मिळाली आहे. तिलक वर्माला या सामन्यात संधी देण्यात आली नाही. तर गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराजही या सामन्यात खेळताना दिसणार नाही. तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेल आणि मीचे स्टार्क या सामन्यात अनुपस्थित असतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत