बुद्ध आणि वैज्ञानिक यांनी कधीच म्हटले नाही की मला सर्व जगाचे ध्यान आहे.

मला सर्व अज्ञात जगाचे ज्ञान आहे असे वैज्ञानिक कधीच म्हणत नाही; मला सर्व अज्ञात जगाचे ज्ञान आहे असे ईश्वरवादी छाती ठोकून सांगत असतात.
कोणताही वैज्ञानिक सर्व ज्ञानी असल्याचा दावा करत नाही. मला सर्व जगाचे ज्ञान आहे असे ईश्वराला मानणारे आणि त्याचे एजंट असा दावा नेहमीच करत असतात. प्राचीन काळात प्रत्येक तो ऋषी ,मुनी ,सेंट धर्मगुरू इत्यादी सर्व ज्ञानी असल्याचा दावा करत होते, खरे तर त्यांना केवळ एक-दोन काल्पनिक गोष्टीचे ज्ञान असायचे किंवा मग त्याची मती भ्रमित झालेली असायची. परंतु कोणत्याही निरईश्वरवादी तत्ववेत्याने असे कधीच केलेले नाही.
बुद्धाच्या कालखंडामध्ये सुद्धा असे सर्व ज्ञानी असलेल्या लोकांची संख्या खूप होती. परंतु बुद्धाने कधीही सर्व ज्ञानी असल्याचा दावा केला नाही. अशा सर्वज्ञानी लोकांसोबत बुद्धाने वैचारिक संघर्ष करून त्यांचे मत खोटे असल्याचे सिद्ध केले.
त्याने म्हटलेले आहे की हे सर्व ज्ञानी लोक जेव्हा भिक्षा मागण्यासाठी जातात तर काही गल्लीमध्ये त्यांच्या मागे मोकाट कुत्रे लागतात आणि मग ते मोठ्या मुश्किलने त्या कुत्र्यापासून आपला जीव वाचविण्यासाठी पळतात. जर हे सर्व ज्ञानी असते तर तर त्यांना बाजूच्या गल्लीमध्ये मोकाट कुत्रे असतात ठाऊक असायला पाहिजे होते आणि त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
वैज्ञानिक कधीही कल्पनेचे शेपूट पकडत नाही तर तो सत्याच्या प्रकाशाने पुढे जात असतो. ईश्वरवादी लोकांप्रमाणे वैज्ञानिक असा कधीच म्हणत नाही की,” मला जे योग्य वाटते तेच खरे आहे.” ईश्वरवादी लोक असे म्हणतात-मला याची जाणीव झाली आहे की , ईश्वरानेच हे ब्रम्हांड निर्माण केलेले आहे. परंतु वैज्ञानिक हे जाणतो की हे ईश्वरवादी केवळ गप्पा हाणतात. त्यांचा हा तर्क नसतो,भ्रम असतो. ही त्या एका व्यक्तीची पसंत आहे त्याची कल्पना आहे. त्याने ही केलेली ईश्वराची कल्पना आहे आणि जरुरी नाही की ती सत्यच आहे.
सनातनी बुद्धिस्ट गंगाधर नाखले
28/01/2025,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत