महाराष्ट्रमुख्यपान

मातोश्रीच्या अंगणात.. तानसेनभाई ननावरे युनायटेड रिपब्लिकन्स…

मातोश्री च्या अंगणात शिवसेना ऊ बा ठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांनी धारावी पुनर्वसन योजना पाचशे स्केवर फूट घरे ती फक्त धारावी येथेच मिळावीत पात्र अपात्र असा भेदभाव न करता सरसकट हरेक घर धारकांला घरे मिळावी सोळा हजार अनिवासी गाळे इत्यादी मागण्या सोबत विकासक अदानी यांस दिलेल्या सोई सवलती रद्द करण्यात याव्या यासाठी मोठा मोर्चा नेला होता
. मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धारावी साठी उद्धव ठाकरे धावून गेलें ज्या धारावी मतदार संघातून आज पर्यंत एकही शिवसेनेचा आमदार निवडून दिला नाही त्या धारावीकरासाठी उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुकले त्यासाठी त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे
. मातोश्री चे वास्तव्य असलेला मातोश्रीच्या अंगणात असलेला खेरवाडी विधानसभा मतदार संघातून अनेकवेळा शिवसेनेचा आमदार निवडून गेला मधुकर सरपोतदार श्रीकांत सरमळकर बाळा सावंत तृप्ती सावंत यांनी खेरवाडी मतदार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे 20019 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झिशान सिद्दीक्की निवडून गेलें ते काँग्रेस आमदार बांद्रा पश्चिमचे बाबा सिद्दीक्की यांचे सुपुत्र आहेंत
. हया खेरवाडी विधानसभेत मुंबईतला पहिला जॉइन्ट कलेक्टड सामूहिक विकासाचा प्रकल्प विलासराव देशमुख सरकारने मंजुरी दिलेला प्रकल्प खार फाटक गोळीबार बालवाडी येथून सुरु होणारा प्रकल्प आंबेवाडी जवाहर नगर निर्मल नगर जयहिंद नगर हनुमान टेकडी इंदिरा नगर ते थेट बांद्रा टार्मिनल बेहराम पाडा नौपाडा असा विस्तारलेला महा जॉईंट व्हेन्चर प्रकल्प त्याच्या विरोधात जागतिक कीर्तीच्या सामाज सेविका मेघा पाटकर उतरल्या मोर्चे धरणे उपोषण व शेवटी कोर्ट कचेरी यामुळे प्रकल्प रखडला सतरा वर्ष झाली हजारो कुटुंबे उध्वस्त झाली अजून विकास पूर्ण झाला नाही घर झोपडे रहिवाशी्यांनी विकासाकाच्या हवाली केले त्यातल्या काही कुटुंबाना तिथेच ट्रांझिट कॅम्प मध्ये स्थलांतरित केले गेल्या सतरा वर्षांपासून नरक यातना सहन करीत आहें काही रहिवाशी भाडेघेवून वसई विरार ला गेली काही दिवस बिल्डरणे भाडे दिले आता भाडेही नाही आणि घरदेखील नाही
. या प्रकल्पचा विकासक आवरसेकर नावाचा मराठी माणूस आहें मुंबई महापालिकेत अभियंता पदावर नोकरीं करीत होता नोकरीचा राजीनामा देऊन बांधकाम व्यवसायात उतरला भायखळा ओव्हर ब्रिजचे बांधकामचे कंत्राट मिळविले अश्या हया परिचित मराठी विकासाकाचे मातोश्री बरोबर स्नेहाचे संबध आहें त्याचा मातोश्री येथे येण्या जाण्याचा राबता आहें
. विलासराव देशमुख गेल्यानंतर त्याचा राजश्रय गेला अहमद पटेल यांची फार मोठी गुंतवणूक होती हया सर्व वाताहत मध्ये हजारो कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झाली
. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना प्रकल्पला गती मिळेल असा विश्वास होता परंतु शंभर कोटी वसुली अंबानीच्या दारात स्फ़ोटके मनसुख हत्त्या सचिन वझे पत्रा चाळ संजय राऊत इत्यादी मूळे वेळच मिळाला नाही आता धारावी साठी मैदानात उतरलाच आहात तर खेरवाडी विधानसभा मतदारसंघातील SRA प्रकल्प तडीस नेण्याचे प्रयत्न करावेत
. मातोश्री च्या लागत भारत नगर नावाची फार मोठी म्हाडा वसाहत आहें हया म्हाडा वसाहतीच्या विकासाचे कंत्राट
दिवाण नावाच्या बिल्डरला दिले होतें हया दिवाण बिल्डरने भारत नगरात भयंकर धुडगूस घातला त्याच्या अनेक रंजक कहाण्या ऐकायला येतात त्याने रहिवाशी्यांची घरे विकत घेतली खरे खोटे व्यवहार केले एक करोड रुपयाला झोपडे विकत घेतल्याचे ऐकण्यात येतात हा दिवाण बिल्डर अनेक प्रकालपात अडकला आहें मध्यंतरी तुरुंगात होता आता परांगादा झाला आहें विकासाची बोंबाबोंब आहें सरकार व म्हाडा पुढे काय करणार गुलदास्त्यात आहें वेळात वेळ काढून एखादा मोर्चा म्हाडा कार्यालयावर काढून भारत नगर हजारो रहिवाशी्यांना न्याय मिळवून द्यावा म्हाडा कार्यालय मातोश्रीच्या दाराजवळ आहें आपल्याला चालावे देखील लागणार नाही. हे दोन्ही प्रकल्प मार्गी लागल्यास आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढविण्यासाठी वरळी अथवा ठाण्याला जाण्याची गरज पडणार नाही
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन्स

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!