ब्राह्मणासाठी धर्म म्हणजे संपत्ती कमाविण्याचा फार मोठा धंदा आहे.

जर एखाद्या ब्राह्मणाला खूप मोठ्या प्रमाणात दानदक्षिणा मिळत असेल तर तो मुसलमान सुद्धा बनतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले पुस्तक ‘ हिंदू धर्माचे रिडल ‘ या पुस्तकाच्या परिचयामध्ये लिहिले आहे-पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की ब्राह्मणांमध्ये अचानक परिवर्तन कसे आले.
एका काळामध्ये ते वैदिक देवतांची पूजा करीत होते. मग एक वेळ असाही आला की त्यांनी वैदिक देवतांना बाजूला सारले आणि अवैदिक देवतांची पूजा आणि वंदन करू लागले.
कोणी त्यांना विचारले की इंद्रा, वरून, ब्रम्हा आणि मित्र देवता कुठे आहे, ज्यांचा वेदामध्ये उल्लेख आहे. त्या देवतांचा आता अपमान का ? याचे कारण असे आहे की इंद्र, वरून आणि ब्रह्मा यांची पूजा केल्याने त्यांना फायदा होत नाही.
गोष्ट एवढ्या पुरतीच मर्यादित नाही की ब्राह्मणांनी वैदिक देवतांची पूजा करणे सोडून दिले, वास्तविकता अशी आहे की ब्राह्मण धनाच्या फायद्यासाठी मुस्लिम पिरांचे भक्त बनले आणि त्यांची पूजा सुद्धा करू लागले आहे.
या संदर्भामध्ये एक ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईच्या जवळ कल्याण मध्ये एका पहाडी टेकडीवर एक पीर बाबा मंगल शहा ची प्रसिद्ध दरगाह आहे. ही दरगाह खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी तेथे उर्स (श्रद्धांजलीचा कार्यक्रम, पुण्यतिथी) चे आयोजन केल्या जाते आणि तेथे मोठ्या प्रमाणात दानदक्षिणा दिल्या जाते.
त्या दरगाह चा पीर (मुजावीर, पुजारी) एक ब्राह्मण आहे तो मुसलमान पिरांसारखा पोशाख करून तेथे उपस्थित राहत आहे आणि दान दक्षिणा लुटत आहे. हा सर्व कमाईचा धंदा आहे. धर्म गेला खड्ड्यात. ब्राह्मणाला फक्त दक्षिणेची गरज आहे. खरे पाहता ब्राह्मणांनी धर्माला व्यापार करून ठेवलेले आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्राह्मणांनी बुद्धाला सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी दान दक्षिणा मिळविण्यासाठी पुराण मध्ये विष्णूचा अवतार करून टाकलेला आहे. याला कारण एकच उपाशी न मरता बुद्धाच्या नावाचा वापर करून दान दक्षिणा मिळविण्याचा धंदा करणे होय.
सनातन बुद्धिस्ट गंगाधर नाखले
25/01/2025
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत