भारतीय राज्य घटना

भारताला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाले.सविधान सभेची निर्मिती करण्यात आली. डॉ राजेन्द्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष नेमण्यात आले.
संसद मध्ये सरदार वल्लभ पंत यांनी घोषणा केली की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेश होऊ नये म्हणून या सदनाचे दरवाजे खिडकी झरोके सुद्धा बंद केले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना चिंता वाटू लागली की मी संविधान सभेत नसेल तर येथील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांचे अधिकार कसे संरक्षित राहतील.
बंगालचे जोगेंद्र नाथ मंडल शेडयूल कास्ट फेडरेशनचे आमदार म्हणाले की बाबासाहेब आपणास चिंता करण्याची गरज नाही.आपला प्रवेश निश्चित होईल.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बंगाल मधून अर्ज सादर केला. जोगेंद्र नाथ मंडलनी सर्व प्रकारे बंदोबस्त करुन बाबासाहेब यांना निवडून संविधान सभेत पाठविले.
संविधान सभा डॉ राजेन्द्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.अचानक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी पाचारण करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले वक्तव्य करीत असताना. सभागृहात टाळ्यांचा वर्षाव होत होता.बाबासाहेब यांचे संविधानाच्या संबंधी तर्क जबरदस्त होते.जे विरोधक होते ते अभिनंदन करुन लागले.
जेव्हा मसुदा समितीचे गठन झाले. तेव्हा मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली.
संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली.घटना तयार होण्यास 2 वर्ष 11महिने 17दिवस लागले.मसुदा समितीने संविधान सभेला दिनांक 26/11/1949ला सादर करण्यात आले.
अनेक सभागृह तील सदस्यांनी हर्ष ध्वनी करून अभिनंदन केले. घटना तयार करतांना संपूर्ण भार बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होता याचे वर्णन केले. अभिनंदन प्रस्ताव ला उत्तर देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझे मन देशाच्या भवितव्याबाबत इतके चिंताग्रस्त आहे की त्या संबंधातील माझी मते व्यक्त करण्यासाठी या प्रसंगाचा मी उपयोग करावा असे मला वाटते.26जानेवारी1950ला भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. त्यांच्या स्वातंत्र्याचे काय होईल. तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवील की पुन्हा गमावून बसेल.हा विचार माझ्या मनात प्रथम उभा राहतो.असे नाही की भारत हा यापुर्वी कधिही स्वतंत्र नव्हता. मुद्दा हा आहे की त्याने असलेले स्वातंत्र्य एकदा गमावले आहे.तो पुन्हा दुसऱ्यांदा गमावेल का. भवितव्याबाबतचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करतो.भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले असे नव्हे तर ते देशातील काही लोकांच्या बेइमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले. ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते. महंमद बीन कासीमने सिंध प्रांतावर आक्रमण केले त्यावेळी दहार राजाच्या सैनिक अधिकार्यांनी महंमद बिन कासीमच्या हस्तका कडून लाच स्विकाराली आणि आपल्या राजांच्या बाजूने लढण्याचे नाकारले. महंमद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणारा जयचंद होता.आणि त्याने त्याला पृथ्वीराज विरूद्ध लढण्यासाठी स्वताच्या आणि सोळंकी राजाच्या मदतीचे आश्वासन दिले. जेव्हा शिवाजी हिंदुंच्या मुक्तीसाठी लढत होता. त्यावेळी इतर मराठा सरदार आणि राजपूत राजे मोगल सम्राटाच्या बाजूने लढत होते. जेव्हा शिख राज्यकर्त्यांचा निःपात करण्याचा प्रयत्न इंग्रज करीत होते. तेव्हा त्यांचा प्रमुख सेनापती गुलाब सिंग शांत बसला.आणि शिखांचे राज्य वाचविण्यासाठी त्याने शिखांना मदत केली नाही.1857ला भारतातील बहुतांश भागांनी इंग्रजांच्या विरूद्ध स्वातंत्र्य युद्धाची घोषणा केली. तेव्हा शिख बघ्यांच्या भूमिकेतून त्या घटनेकडे पाहत राहिले.
इतिहासाची पुनरावृती होईल काय.याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातीच्या आणि संप्रदायाच्या स्वरुपातील आपल्या जुन्या शत्रू सोबतच भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रणाली असणार्या बर्याच राजकिय पक्षांची भर पडणार आहे.हया वास्तवाच्या जाणिवेने मी अधिकच चिंतातूर झालो आहे.भारतातील लोक आपल्या तत्वप्रणाली पेक्षा देशापेक्षा मोठे मानतील की देशांपेक्षा तत्वप्रणालीला मोठे मानतील.मला माहित नाही.परतु येवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वताच्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर आपले स्वातंत्र्य दुसर्यांना धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्य ते विरूद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केला पाहिजे. अश्या प्रकारचे देशभक्तीने ओतप्रोत विचार व्यक्त केले.
देश सविधानाचे 75वे वर्ष साजरे करीत आहे.देशात धार्मिक उन्माद हे उच्चांकावर असून अल्प संख्याक लोकांत भिंती ग्रस्तमानसिकता निर्माण झाली असून
सरकार ज्याप्रमाणे खाजगीकरण करून सामाजिक कल्याणाची योजना गुडाळीत आहेत.
घटनांनी दिलेले अधिकार अबाधित राहतील किंवा नाही याची चिंता आहे.
जातीयवाद आपले तोंड उघडून आपले नागडेरुप प्रदर्शित करीत आहे.
विषमतावादी व्यवस्थेचा जोर वाढत असून समतावादी विखुरलेल्या अवस्थेत आहेत.
घटना वाचविण्याची जबाबदारी सर्व भारतीय नागरिकांची आहे.कारण घटनेने सर्वांना संरक्षण दिले आहे.
काही लोक घटना बदलवून मनुवादी घटना आणण्यासाठी प्रयत्नशील असून काही खासदार जाहिर वक्तव्य करीत आहे. यापासून सावध असणे आवश्यक आहे.
घटनेने सर्वांना आपल्या श्रद्धा नुसार उपासना करण्याचा अधिकार बहाल केला आहे.
हा देश सर्व धर्मियांचा असून सर्वांना आपल्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे.
परंतु काही लोक जाणून बुजून हिंदुंचा देश असून दुसर्याची त्यांच्या अधिपत्याखाली राहावे असे विचार प्रदशिर्त करीत असतात हे राष्ट्र ऐक्याच्या दृष्टिने घातक आहे.या दृष्टिने विचार व्हावा
विनायकराव जयवंतराव जामगडे
रा .बिडगाव सम्यक बुद्ध विहार जवळ जुनी वस्ती पोष्ट कळमना भंडारा रोड नागपूर 440035
9372456389
7823093556
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत