राज्यातील काही भागात थंडीची चाहूल

नोव्हेंबर चालू असल्यामुळे देशातील काही भागांत थंडी वाढली आहे. राज्याच्या काही भागांत थंडीची चाहूल जाणवू लागली आहे थंडीचा हा जोर आता महाराष्ट्रात असणार आहे. येत्या गुरुवारपासून राज्यात आग्नेयकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. या वाऱ्यांसह बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. . तसेच पुढील तीन दिवस किमान तापमानात घटीचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत अजून फारशी थंडी पडली नाही. परंतु आता थंडीचा जोर वाढणार आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत