निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; देशाच्या निर्णायक क्षणी भूमिका बदलल्याने जुन्या सहकाऱ्याने सोडली साथ

(फोटो : किर्तिकुमार शिंदे यांच्या फेसबुक पोस्ट वरून..)

मुंबई : मनसे च्या गुढी पाडवा मेळाव्याचे पडसाद दिसायला सुरुवात झालेली आहे. शिंदे फडणवीसांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले असले तरी पक्षांतर्गत “बिनशर्त पाठिंबा” ही बाब न समजल्याने किंवा न पटल्याने मनसे ला गळती लागण्याची शक्यता आहे. मनसैनिकांनी वेगळा निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांनी मनसे ला यापूर्वीच सोडचिठ्ठी दिली आहे आणि आता राज ठाकरे यांचे जुने सहकारी आणि पक्षाचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्ष सोडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा दिला आहे. देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. लोकसभा, राज्यसभा विधान परिषद काहीही नको. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर ठाकरे गटाने टीका केली आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला टाटा बाय बाय केला आहे.

एक भली मोठी फेसबुक पोस्ट करत त्यांनी भूमिका मांडली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!