महाराष्ट्रमुख्यपान

जावयाने केलेल्या हल्ल्यात सासरवाडीच्या तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर.

शिर्डीजवळ सावळीविहीर गावात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपली सासूरवाडी गाठून दिसेल त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. कदाचित त्याला संपूर्ण कुटुंब संपवायचं होतं. या घटनेत पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पत्नी सतत माहेरी जायची. आपल्या संसासारत सासूरवाडीच्या मंडळीचा हस्तक्षेप वाढत आहे. या संशायवरून आणि रागातून जावयाने हे कृत्य केल्याची माहिती आहे. जो दिसेल त्याच्यावर तो चाकून वार करीत होता. यामध्ये सहा जण जखमी झाले. तर वर्षा निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड यांचा मृत्यू झाला. आरोपीचा संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा डाव असल्याचं त्याच्या कृतीतून दिसून येते. घराचा दरवाजा उघडताच तो दिसेल त्याच्यावर वार करत सुटला होता.

याप्रकरणी संशयित सुरेश निकम याला पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शिर्डी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!