महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

अंत्योदय योजने नंतर आता नवनीत राणा यांच्याकडून टाकाऊ साड्या वाटून मतदारांची थट्टा..

अमरावती : हनुमान चालीसा भक्त आणि खोटे जात प्रमाणपत्र प्रकरणातून कायम चर्चेत असलेल्या राणा दाम्पत्यावर आदिवासी समाज सध्या संतप्त आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात हजेरी लावत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्याच अनुषंगाने मेळघाट येथील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्याचा प्रयत्न नवनीत राणा यांनी केला. याप्रसंगी महिलांना साड्यांचे वाटप केले.

राणा दाम्पत्यांनी वाटलेल्या साड्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून त्या अजिबात घालण्याच्या लायकीच्या नाहीत असा संताप आदिवासी महिलांनी व्यक्त केला.

राणा दाम्पत्यांनी वाटप केलेल्या साड्या आहेत का मच्छरदाण्या असा प्रश्न आदिवासी महिलांना पडला आहे. या साड्यांचे नेमके करायचे काय करावे ? घालायचे की मच्छरदाणी बनवायचे असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केलेला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अशा साड्या वाटून आमची थट्टा लावली आहे काय असा संतप्त सवाल देखील महिलांनी उपस्थित केला

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!