देश-विदेश

पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होणार; व्ही. के. सिंह

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात कधी विलीन होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. काही काळ थांबा, पीओके आपोआप भारतात विलीन होईल, असे सिंह यांनी म्हटले.

राजस्थानमधील दौसा येथे सिंग यांनी हे वक्तव्य केले. पाकव्याप्त काश्मीरमधील शिया मुस्लिमांसाठी भारतात येण्याचा मार्ग खुला करण्याबाबत त्यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करा असेही केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी म्हटले.

दरम्यान, सिंग यांनी नुकत्याच पार पडलेल्या जी-20 परिषदेबाबत माहिती देताना म्हटले की, G-20 बैठक यशस्वी झाली आहे. असा संघटित कार्यक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता. देशातील 60 शहरांमध्ये सुमारे 200 बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. भारताने उत्तम प्रकारे G-20 परिषदेची आयोजन केल्याबद्दल इतर देशांनीदेखील कौतुक केले आहे.

या जी-20 परिषदेत जारी केलेल्या सामूहिक जाहीरनाम्यात भारताने मोठा विजय मिळवला असल्याचा दावा व्ही. के. सिंह यांनी केला. युक्रेनसह अनेक मुद्द्यांवर जग विभागले गेले होते, परंतु पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्दीपणाने आपण सर्वांनी मिळून एक मार्ग शोधून काढला. ज्यावर कोणत्याही देशाचा कोणताही आक्षेप नव्हता, असे सिंग यांनी म्हटले. भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!