छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात मोगलशाही यायला पाहिजे होती मग पेशवाई कशी आली ?

धोक्याने असो की षडयंत्र करून असो छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर शिवशाही समाप्त झाली, परंतु तेथे मुघलशाही यायला पाहिजे होती. मग तेथे पेशवाई कशी आली ?
छत्रपती संभाजी महाराज पकडून देण्यात आल्यानंतर आणि त्यांची हत्या करण्याचे सर्व षडयंत्र हे पेशवा ब्राह्मणांचे होते. म्हणून त्यांना पेशवाई देण्यात आली. म्हणजेच पेशवा ब्राह्मणांचे राज्य हे गुप्त करारानुसार महाराष्ट्रात आले होते.
हा गुप्त करार काय होता हे या पत्रावरून समजते. औरंगजेबाने 30 ऑक्टोबर 1699 ला रामचंद्र पंडित अमात्य यांना पत्र लिहिले होते- “तुम्ही तूरबतखान याला लिहिलेले पत्र आम्ही पाहिले. आम्ही तुमचे म्हणणे मान्य केलेले आहे. तुम्ही जसे लिहिले तसेच वागा. राजाराम भीतीमुळे पळून जात आहे. तुम्ही तुमच्या ताब्यातील मुलखाचे उत्तर द्या. तुमची बढती होईल. नाहीतर संभाजीचे जे झाले तेच राजारामाचे होईल, तुम्हा सर्वांचे तेच होईल.”(Tarabai Papers Collection of Persion Letters, संपादक-आप्पासाहेब पवार, पृष्ठ 190)
पेशवा ब्राह्मणांनी शिवशाही नष्ट करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली होती हे या पत्रातून सिद्ध होत आहे.(संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज का बौद्ध धर्म से संबंध, लेखक: डॉक्टर विलास खरात, प्रताप चाटसे, मराठी अनुवाद: प्रा. गंगाधर नाखले
12/12/2024
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत