देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

हिंदु राष्ट्र…की..धर्मनिरपेक्ष राष्ट्र???

विचार करा..थोडे थांबा.
अंतर्मुख व्हा..आणि!!!!

हे सारं आपल्या बाबासाहेब
आंबेडकरांच्या संविधानाच्या
विरोधात चालले आहे. मोदीं
पासून गडकरी फडणविस कंठशोष करून
संविधानाचे गुणगान गात
आहेत. संविधान दिवस
साजरा होत आहे. संविधान
आणि बाबासाहेबांच्या
तसबिरी..पुतळ्यासमोर
नतमस्तक होत आणाभाका
घेत आहेत. दंडवत घालत
आहेत..पण!!!!

पण हे सगळं मगरीचे अश्रु
आहेत. हिंदु राष्ट्राच्या आड
प्रथम मुसलमान..ख्रिश्चन
यांना टार्गेट केले जात आहे.
नंतर रांगेत आपण ..दलित
आदिवासी बौध्द..आणि त्या
नंतर मागासवर्गीयां पासून इतरांची फार..फार..
मोठी रांग आहे. आम्ही आता मुर्खांच्या नंदनवनात
आहोत..सध्या सुपात आहोत. अज्ञानात मोठं सुख असते.

मनुप्रेरीत चातुर्वर्ण्य आलेला
नाही…. हा भोळसट समज
पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. चातुर्वर्ण्य देशात आला आहे.. गावागावातून चावडीत…चावडीतू दारात…तर दारातून घरात कधीच आला आहे. घरातच सैताना सारखा आमच्या बोकांडी बसला आहे.

रोज येणारी वर्तमानपत्रे
आणि समाज माध्यमांवर
येत असलेल्या बातम्या बघा.
अंगावर शहारे आणणा-या
घटना बघा. बलात्कार, मारहाण, जातीवाचक शिव्या नित्याची बाब आहे.
पण मध्य प्रदेश येथील
ह्रदयद्रावक घटना पाहिल्यावर चातुर्वर्ण्य
वापसीची कल्पना येते.
या घटनेत सगळ्या गांवानेच
दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. त्यांना किराणा आणि इतर
आवश्यक वस्तु विकत घेण्यास बंदी केली आहे.
डॉक्टरने वैद्यकीय उपचार
करायला नकार दिला आहे.
गांवाच्या आदेशांचे पालन न करणा-यास एक हजार रूपयांचा दंड घोषित केला आहे.

केंद्रात नरेंद्र..तर राज्यात
देवेंद्र सरकार आले आहे.
यांची नाळ आर.एस.एस.
ला बांधली आहे. यांचे
आदर्श आणि आमचे आदर्श
यांत जमिन अस्मानाचा फरक आहे. यांना जातीयवादी. अमानवीय
मनुस्मृती वंदनीय आहे. तर
आम्हाला मानवतावादी..
धर्मनिरपेक्ष भारताचे संविधान पुजनिय प्रमाण
आहे. ती एक मानवतावादी
जिवन शैली आहे.

आता निवडणूका होऊन
निकाल लागले आहेत.
नेते मंडळींनी स्वतःला सावरावे. पाय जमिनीवर
ठेवून अंतर्मुख होऊन सकारात्मक झाले पाहिजे.
आता टिकाटिपणी, निंदा नालस्ती हेवेदावे,उखाळ्या पाखाळ्या, इर्षा, स्पर्धा.. किंवा…. पुढचे मागचे जुने हिशोब चुकते करायचे नाहीत. सकारात्मक भूमिका घेवून
पुढची दिशा ठरवायला लागेल… कारण आपण सारेजण संत शिरोमणी संत रविदास आणि बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. चर्मकार समाजात
अनेक दिग्गज आणि चतुरस्त्र नेते आहेत. अनेक
वर्षांपासून कार्यरत आहेत.
विविध पक्षांत विभागले
आहेत. निवडणूकीचा धुराळा खाली बसला आहे.
समाजासाठी नेटाने आणि
निष्ठेने काम करण्यासाठी
एकीसाठी एक होऊ या.

समाजातील जुन्या जाणत्या, धुरंधर, मान्यवर नेते मंडळींनी पुढाकार घेऊन समविचारी मंडळींची बैठक आयोजित करावी..जवळपास दोनशे शूर, लढाऊ नेक आणि सामाजिक बांधिलकी असलेले नेते आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात बाप आहे. त्यांची आपापसात तुलना होऊच शकत नाही. या आपल्या मान्यवरांनी यातूनच आता सर्वसमावेशक मार्ग काढावा. ही सर्वांना अंत:करणापासून नम्र विनंती.

जय भीम

जय रविदास

गायकवाड वकील
९८१९७७०१८९

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!