सरळ सरळ EVM चा घोटाळा दिसतं आहे.

आदरणीय राहुल गांधी जी , शरद पवार जी , उद्धव ठाकरे जी , नाना पटोले जी , राज ठाकरे जी , प्रकाश आंबेडकर जी व मनोज आखरे जी यांस…
सविनय सदिच्छा!
तुम्ही सर्व एका मोठ्या पक्षाचे प्रमुख आहात, तुमच्या सर्वांच्या मागे लाखोचा, करोडोचा जन समुदाय आहे.
हा समुदाय तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही या देशासाठी, राज्यासाठी व या जनसमुदायासाठी चांगलं काहीतरी कराल अशी अपेक्षा ठेवतो.
परंतु मागील दहा वर्षात देशभरात झालेल्या निवडणुका पाहिल्यात तर या सर्वच्या सर्व निवडणुका असंविधानिक पद्धतीने EVM मधील मतांची हेराफेरी करुन धर्मांध भाजपा सत्तेवर येत आहे. मागच्या महिन्यात हरियाणा, त्या अगोदर, बिहार व उत्तर प्रदेश निवडणूकांमध्ये EVM घोटाळा स्पष्ट दिसला, सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूकित 79 जागावर व आता महाराष्ट्रात 95 जागांवर ऐकूण झालेले मतदान व मोजलेले मतदान याचे आकडे मिळत नाहीयेत. म्हणजेच सरळ सरळ EVM चा घोटाळा दिसतं आहे, हे स्पष्ट दिसतं आहे.
निवडणुकीत तुम्ही संपूर्ण देशाच्या लोकांना अनेक आश्वासने दिली, सुखी समाधानी आयुष्याची स्वप्ने दाखविलीत.
आता आम्हाला तुमच्यावर शंका येते आहे, तुम्ही सर्व लोकांनी मतदानाच्या वेळेस करोडो रुपये पैसा खर्च केला,
तुमचे कार्यकर्ते दिवसरात्र झटले, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले. परंतु तुम्ही काय केलेत?
येवढा मोठा EVM घोटाळा तुमच्यासोबत झाला, तुमची स्वतः ची व तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची स्वप्ने मातीत मिसळली गेली गेली तरी तुम्ही शांत का?
तुम्ही तुमच्यावर अन्याय झालाय त्या विरुद्धच तुम्ही स्वतः भूमिका घेवून रस्त्यावर उतरणार नसाल तर या लाखो करोडो जनतेने तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तुमच्यामागे का यावं?
असे असेल तर तुम्ही तुमचा पक्ष बंद करुन आमच्या सारखं सामान्य नागरिकांचं आयुष्य जगाव, सोडा ते नेतृत्व आणि सांगा लोकांना आम्ही हतबल आहोत, काहीही करू शकत नाही.
राहुल जी, शरद पवार जी, उद्धव जी तुम्हांला भाजपा मार्फत ज्या काही 50 भिकेच्या जागा मिळाल्यात, त्या सोडा, तुमच्या सर्वच आमदार व खासदारांना सामूहिक राजीनामे दयायला सांगा.
तुम्ही रस्त्यावर या, तुमचे आमदार खासदार, पदाधिकारी रस्त्यावर येऊद्यात.
या अगोदरही देशातल्या अनेक क्रांतीच्या लढायांचं नेतृत्व महाराष्ट्राने केले आहे, आताही होवू दे, पुढे सर्वच राज्य व त्यातील पीडित पक्ष व जनता तुमच्या सोबत येईल.
आंतरराष्ट्रीय न्यायालय, मीडिया व राष्ट्र संघाला याची दखल घेवू द्यात, जगभरातील इतर देशांना कळूद्यात.
राष्ट्रपतीना निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी करा,
पून्हा सर्व निवडणूका मतपत्रिकेवर घ्यायला भाग पाडा.
आता तुम्ही म्हणाल की परत खर्च येवढा खर्च कुठून व कसा करायचा? किती नुकसान होईल? त्यांना मी म्हणेन देश वाचवायचा असेल, राज्य वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल, संविधानाची मूल्ये वाचवायची असतील, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण व जीवन अर्पण केलेल्यांचे विचार वाचवायचे असतील, स्वतंत्र, समता, बंधुता यासाठी झटणाऱ्या महापुरुषांचे कार्य व सन्मान वाचवायचा असेल तर होवू द्या खर्च, थोड्या नुकसानीनें देशाचं भवितव्य सुधारणार असेल तर होवू खर्च.
तरीही सांगतो या सर्व निवडणूकासाठी होणारा खर्च हा नोटबंदी घोटाळा, राफेल घोटाळा, पीएम केअर फंड घोटाळा, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, राम मंदिर घोटाळा व अडाणी अंबानी ला दिलेल्या कर्ज माफिच्या रकमेपेक्षा खूप म्हणजेच खूप कमी होईल.
तुम्ही एक आवाज दिलात तर सर्व भारतीय बाहेर येतील, परंतु तुम्हांला एकच विनंती आहे की तुम्ही दुसऱ्या कोणाच्या खांद्यावरुन गोळी झाडू नका, स्वतः बाहेर या, आज EVM विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन उभं राहिलं आहे, यांच्या मागे दडून बोलू नका, या आंदोलनात आमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा, स्वतः बाहेर या आपापसातले वाद हे घरातले वाद आहेत, ते नंतरही सोडवता येतील. आता एकत्र या, या देश द्रोही निवडणूक आयोगाला बाहेर काढा.
आता नाही तर परत पुढे कधी होणार नाही, सुरवात तर आताच करावी लागेल.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम!
(मित्रांनो शक्य झाल्यास पुढे forward करा, तुमच्या द्वारे वरील नेत्यांपर्यंत पोहचू द्या.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत