आर्थिकउद्योगदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बौद्धानो आपली स्वतंत्र व्यवस्था तयार करा

बौद्धानो आपली स्वतंत्र व्यवस्था तयार करा . दहा वर्षात तुम्ही भारतातील अत्यंत पुढारलेला समाज म्हणून पुढे याल.
प्रत्येक बौद्ध बांधवांपर्यंत हा मेसेज पाठवा आणि शक्य तेवढ्या गोष्टींचं पालन आजपासून सुरू करा .

प्रस्तापितांनी तुम्हाला व्यवस्थेच्या दूर ठेवण्याचीच व्यवस्था केली आहे . पण आपण केवळ रडत बसणारं का . नाही
मग आता स्वयंपूर्ण होण्याची वेळ आली आहे .
काय करावे ?
आपली स्वतंत्र अर्थ व्यवस्था !
१.आपल्याच व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करा
२. आपल्याच पोराणा काम द्या
३. ⁠आपल्या लोकांनी दिलेले काम दर्जेदार करा . त्यांस धोका देऊ नका .
४. लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठी वस्तू समाजबांधवाकडून घेतली तर समाजाचा पैसा समाजातच खेळता राहिल. नागपूरच्या इंदोरा भागात आपल्या पैशावर सिंदी समाज मोठा झालाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे .
५. जिथे जिथे विहार किंवा छोटी मोठी संघटना कार्यरत आहे तिथे सर्व सभासदानी दरमहा १००/२००/३०० रुपये गोळा करून निधी जमविल्यास मोठा निधी तयार होईल यातून उपलब्ध जागेवर मल्टीपरपोज हॉल बांधून पुढील कार्य वेगाने पुढे नेता येईल .
६. शेयर मार्केट कडे सर्वांनी लक्ष द्यावे . लक्षात ठेवा बाबासाहेबांनी मुंबई येथे शेयर कंपनी स्थापन केली होती पण अती व्यस्ततेमुळे पुढे नेऊ शकले नाही .
दरमहा sip करुन म्यूचूअल फंड मध्ये निधी इन्व्हेस्ट केल्यास प्रत्येकाचे आर्थिक भविष्य संरक्षित होईल .
७. शासनाच्या अनेक विभागाच्या कौशल्य विकास योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणाना उद्योजकतेकडे वळणे आवश्यक आहे .
८. आरक्षण आता संपले आहे त्यामुळे नवीन वाटा तपासणे आवश्यक आहे . जास्तीत जास्त विद्यार्थी foreignएजुकेशन साठी तयार करावेत .
९.

आपली समाजव्यवस्था
१. आपल्या सर्व उपजाती ( महार) एकोप्याने रहाव्या .
२. ⁠उपजातीत भेदाभेद नको
३. ⁠उपजातीत जास्तीत जास्त रोटीबेटी व्यवहार करा.
४. ⁠आपल्या मुलांनी आंतरजातीत लग्न करुन धर्मांतर करु नये . आपली संस्कृती वाढली पाहिजे .
५. ⁠शक्यतो समाजातीलच गोरगरीब मुलींशी लग्न करा . किंवा इतर जातीत लग्न केले तर त्यांना इकडे आणा तुम्ही तिकडे जाऊ नका .
६. ⁠आपल्या लोकाना धोका देऊ नका . सध्या आपल्या लोकांचा आपल्या सर्वांना वाईट अनुभव आहे . आपल्या लोकांशी विश्वासपूर्ण व्यवहार करा .
७. ⁠आपल्या लोकांची फितुरी करु नका . तुम्ही इतरांच्या सोबत काम करताना आपल्या समाजाला विकू नका . आपल्या लोकांशी फितूर होऊ नका .
८. ⁠समाजाशी गद्दारी नको . समाजात काम करताना काही महत्वाच्या बाबी तुमच्या हाती लागतात तेव्हा प्रस्थापित मंडळी तुम्हाला जवळ करते व पद पैसा प्रतिष्ठा देऊन तुम्हाला अप्रत्यक्षरित्या खरेदी करते . अश्यावेळी बाबासाहेबांचा स्वाभिमान आठवा आणि त्यांच्या सारखे वागण्याचा प्रयत्न करा . स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला विकू नका .
९. ⁠आपल्यातील फितुर ओळखा . आपले अनेक बांधव आतून इतरांशी हातमिळवणी करून समाजाला विकत आहेत त्यांना ओळखा आणि त्याना उघडे करा . त्यांना कोणत्याही पद्धतीने समाजाची मदत होऊ देऊ नका .
१०. ⁠१४ एप्रिल ला आता समाजात खरा बंधुभाव निर्माण होईल अश्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करा . विहारविहारात चांगले धम्मप्रशिक्षक बोलवून समाजाची खरी चेतना जागी करा .
११. ⁠चांगल काम करणाऱ्यांचे पाय ओढू नका . पुढे येऊन चांगल काम करणे
फार कठीण असतं . तुमच्या आजूबाजूला असे काही लोक दिसतील जे खरोखर चांगल्या भावनेने काम करत असतात त्यांना मदत करा . काही चुका त्यांच्याही होतात त्या प्रांजलपणे त्यांना सांगा मात्र पटकन तोडातोड करू नका .
१२. सामाजिक काम करताना निस्वार्थी भावनेने काम करा . मला काही भेटेल ही भावना ठेवू नका . स्वतःला काही पाहिजे असेल तर सामाजिक काम करु नका व्यवसाय करा .
१३. ⁠आपसापसातील हेवेदावे दुरु ठेवा . एकत्र काम करताना माझा सहकारी मोठा होत असेल तर त्याचे पाय मी ओढू नये .
१४. ⁠समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांना वाळीत टाका . आपली अनेक लोक प्रतिगामी शक्तींसोबत काम करीत आहेत त्यांना वाळीत टाका . तसेच आपले अनेक लोक धम्माच्या विरुद्ध काम करतात त्यांना वाळीत टाका .

धर्मव्यवस्था
१. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन अनन्वित उपकार केले आहेत . सध्या समाजाची प्रगती यामुळेच झाली आहे . या त्रिरत्नाची जपणुक करा .
२. दर रविवारी ⁠विहारात जा . दर वर्षी धम्मप्रशिक्षण अटेंड करा .
३. ⁠मुलबाळाना धमाप्रशिक्षण वर्गात आवर्जुन पाठवा .
४. ⁠भिक्षुसंघाला नियमित भोजंदान करा व त्यांच्याकडून धम्म ग्रहण करा .
५. ⁠भिक्षुना दान द्या वृद्ध भिक्षूंच्या औषधाची व्यवस्था करा . वर्षावासाला यथोचित नियोजन करा .
६. ⁠धार्मिक संस्कार नियमित पाळा . धार्मिक दिनांना आयोजन करा .
७. ⁠धम्मकार्य करणाऱ्या संस्थांना दान द्या प्राधान्याने मदत करा .
८. वाईट भिक्षुना उघडे पाडा.
९. ⁠भिक्षूंच्या चुका स्पष्ठपने त्यांच्या निदर्शनास आणा .

राजकीय व्यवस्था
१. आपले राजकीय पक्ष सध्यातरी महाराष्ठ्रात काही करू शकतील अशी परिस्थिती नाही . त्यामुळे त्यांच्या मागे लागण्यापेक्षा जे आपले चांगले बांधव राजकारणात आहेत त्यांना सहकार्य करा .
२. ⁠सर्वांनी राजकारण करू नये . ती उर्जा व्यवसाय व व्यापारात लावा . आपल्या अनेक नेत्यांना प्रथापितानी टारगेट करुन संपवल आहे . याचे कारण समाजात सांस्कृतिक चळवळ मजबूत न होताच आपण राजकीय चळवळ करायला निघालो .
३. ⁠आता पहिले समाजाची सांस्कृतिक व धार्मिक चळवळ मजबूत केल्याशिवाय सक्रिय राजकारणावर एवढी उर्जा खर्च करु नये . काही बांधवाना पुर्ण वेळ राजकारण करू द्यावे व आपण त्यांना सहकार्य करावे .
४. ⁠सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील बौद्ध , मातंग व चर्मकार यांची लोकसंख्या अनुक्रमे ६५%, २०% व १०% एवढी आहे मात्र गेल्या विधानसभेत आमदारांची जातनिहाय संख्या – बौद्ध -४ , मातंग -८ तर चर्मकार १७ अशी आहे . ही पूर्णतः विसंगती आहे . याला प्रस्थापितबरोबरच आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
५. ⁠त्यामुळे आपले जास्तीत जास्त आमदार विधानसभेत कसे जातील यावर फोकस करा .
६. ⁠आपल्या आमदारांना पाडायला प्रस्थापित लोक आपलेच डमी उमेदवार उभे करतात . हे फितूर लोक आपल्या सक्षम उमेदवाराला पाडायचं काम करतात अश्या लोकाना ओळखा व आपले जास्तीतवजास्त उमेदवार विधानसभेत पाठवा .
७. ⁠प्रतिगामी पक्षात काम करणाऱ्या आपल्या लोकाना वाळीत टाका . त्यांच्याशी सामाजिक व्यवहार बंद करा .
८. ⁠पुरोगामी पक्षात काम करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मागे समाजाने उभे राहावे .
९. ⁠केवळ आंबेडकरी पक्ष या नावावर समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या नादाला लागू नका .
१०. ⁠समाजाने आता मुस्लीमांसारखं तेलीसमाजासारखं एकगठ्ठा मतदान करण आवश्यक आहे .

प्रशासकीय व्यवस्था
१. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी याना सामाजिक संघटनांनी संपर्क स्थापून आपल्या लोकांची कामे तातडीने मार्गी लावने .
२. ⁠विविध विभागाच्या योजना प्राधान्याने आपल्या लोकाना देणे .
३. ⁠विविध विभागाच्या योजना अंमलबंजावणीसाठी सामाजिक संघटनांचा दबाव गट निर्माण करणे आवश्यक आहे .
४. ⁠समाजाची संपूर्ण शक्ती राजकारणात घालवण्यापेक्षा काही लोकांवर राजकारण सोडून आपण सर्वांनी प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजनांचा लाभ उठवण्यासाठी शक्ती पणाला लावली पाहीजे .
५. ⁠बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेली आर्थिक लोकशाहीच्या अनेक योजना आपण लक्ष न दिल्याने व्यर्थ वाया जातात . तसे होऊ देऊ नये .
६. ⁠शासनावर समाजमाध्यम व इतर माध्यमातून दबाव निर्माण करुन आपल्या हक्काचा निधी वापरून घेतला पाहिजे .
७. ⁠लोकसंख्यांच्या प्रमाणात निधी देण्यासाठी जनमत तयार केले तर सहज हे शक्य आहे . हे झाले तर कुठल्याही राजकीय शक्ती शिवाय समाजाचे उत्थान होईल .
८. ⁠प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सामाजिक सघटनांनी प्राधान्याने समन्वय साधला तर अनेक बाबी शक्य होतील .
९. ⁠प्रशासनात काम करणाऱ्यांनी व सामाजिक संघटनांनी आपला आपला इगो दूर ठेवून समाजातील गोर गरीब बांधवांच्या उत्थानासाठी एकत्र आले पाहिजे .

हा मेसेज सर्व बौद्ध ग्रुप वर पाठवा .
सर्व विहारात यावर चर्चा करा व स्थानिक पातळीवर नियोजन करा.जय भीम, नमो बुद्धाय 🙏!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!