शिक्षक पदवीधर मतदारसंघात आंबेडकरी मतांचे काय?

महादू पवार
पत्रकार,मुंबई
9867906135
महाराष्ट्र राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात आंबेडकरी रिपब्लिकन मते निर्णय असताना या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये आंबेडकरी रिपब्लिकन चळवळ कुठे पराजित होत आहे, त्याचे खऱ्या अर्थाने चिंतन करणे गरजेचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र मुंबई, उत्तर महाराष्ट्र या भागात शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर उमेदवार निवडून जातात. परंतु या मतदारसंघांमध्ये आंबेडकरी रिपब्लिकन मते नेमकी कुठे जातात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामागे परिस्थिती समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आंबेडकरी रिपब्लिकन 12 टक्के मते निर्णय ठरत आहेत. त्यामध्ये योग्य बांधणी केली तर इतर समाजाची मते घेऊन ही टक्केवारी 20 ते 25 टक्क्यांच्या आसपास गेली तर महाराष्ट्रातली राजकारण खऱ्या अर्थाने रिपब्लिकन आंबेडकर मतांवर निर्णायक ठरू शकते. परंतु राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा प्रकारचे राजकारण 1956 वर्षी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला करता आले नाही. याची खंत व्यक्त करावी लागेल. 1990 च्या आसपास स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये निर्णयाक बाजी मारता आली. परंतु रिपब्लिकन पक्षामध्ये एक मतांची निर्णयाक ताकद असताना या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये जम बसवताना आलख नाही. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याच पक्षाला म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचे विविध गट त्यामध्ये भर पडलेला बहुजन समाज पक्ष आणि आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वखालील
वंचित बहुजन आघाडीला सुद्धा लोकसभेमध्ये लाखोंची मते पडले असताना शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये अजिबात यश प्राप्त करता आले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा निर्णयाक मते असतानाही त्यांनाही पदवीधर मतदारसंघांमध्ये साधे उमेदवार मिळत नाही. ही बाब ही अधोरेखित करावी लागेल. पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना देखील विदर्भात जम बसवता आला नाही. अथवा पदवीधर मतदारसंघांमध्ये व शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवार मिळत नाही. याचा अर्थ रिपब्लिकन आंबेडकरी राजकीय परिस्थिती किती रसातळाला गेलेली आहे. हे पदवीधर शिक्षक मतदारसंघ यांची बांधणी करण्यासाठी पुरेपूर पाच वर्षे असतात. गेल्या सात ते आठ दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी एक उच्चशिक्षित वर्ग रिपब्लिकन आंबेडकर चळवळीमध्ये निर्माण झालेला आहे. या मतदारसंघाची साधी बांधणे ही रिपब्लिकन पक्ष आदी संघटना यांना करता आले नाही. म्हणजेच स्वतःची वोट बँक निर्माण करता आली नाही. त्यामुळेच रिपब्लिकन आंबेडकरी मते या दोन्हीही महत्वांच्या मतदारसंघांमध्ये गणली जात नाही. यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे?
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी गेल्या दोन दशके काही ठराविक नेत्यांकडे जबाबदारी सोपवली गेली असती तर निदान आजची रसातळाला गेलेली रिपब्लिकन आंबेडकरी मतांचे एक मोठी राजकीय शक्ती निर्माण झाली असती. परंतु त्या प्रकारे असे घडत नाही. त्यामुळे रिपब्लिकन आंबेडकरी मते विचारात घेतली जात नाही. त्यामुळे अजूनही परिस्थिती बदलता येऊ शकते. त्यासाठी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी आत्ता पासून बांधणी केली तर किमान या मतदारसंघांमध्ये अनेक पदवीधर, शिक्षक, विचारवंत निवडणूकीत निवडून येतील. त्यांचा महाराष्ट्राच्या आणि शोषित, पिढीत समाजाच्या विकासासाठी हातभार लागू शकतो. आताच्या पदवीदार, शिक्षक मतदार संघामध्ये कोणत्याही रिपब्लिकन गट बहुजन समाज पक्ष अथवा वंचित बहुजन आघाडीला उमेदवार मिळत नाही. अथवा तसे राजकारण घडत नाही ही बाब शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यामुळे पुढील पाच वर्षांचा आणि नव्या तरुण शिक्षित पिढीचा विचार करता आतापासूनच बांधणी करण्याचा विचार केल्यास ही परिस्थिती बदलू शकते. ती बदलली तरच महाराष्ट्राच्या राजकारणात एक क्रांती होईल, असे म्हणता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत