मनुस्मृती जाळता जळत नाही.

शिवराम पाटील
अडीच हजार वर्षांपूर्वी सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती बाबत जे लिहीलेले असेल ते आज कोणी वाचत नाही.तितका वेळ कोणाकडे नाही.तरीही बरेच लोक गर्दीत शिरून समर्थन किंवा विरोध करतात.हा सुद्धा मनुस्मृतीचा परिणाम आहे. मनुस्मृती म्हणजे तत्कालीन परिस्थितीची माहितीचे संकलन.ते पुस्तक जाळले तरीही ती माहिती खोटी ठरत नाही ती माहिती मनातून जात नाही.अजून तरी गेली नाही.कदापि जाणार नाही.कारण आम्ही मनुस्मृती नाकारणारेच मनुस्मृती चे तंतोतंत अनुपालन करतो.
मी कलेक्टर आहे.तहसिलदार किंवा तलाठीने मला शहाणपणा शिकवू नये.मी रेतीचा हप्ता घेतो.तरीही मला कोणीही प्रश्न करू नये.हिच तर मनुस्मृती आहे.जळगांवचे कलेक्टर, सिव्हिल सर्जन आणि पालकमंत्री यांनी कोरोना काळात औषधी व वैद्यकीय यंत्रसामग्री न घेता चारशे कोटी चे बील काढून पैसा हजम केला.आम्ही एसपी कडे तक्रार केली.तर म्हणाले,मी नाही घेत तक्रार.कुठे जायचे तेथे जा.कारण हा भ्रष्टाचार कोणी ऐरागैरा माणसाने केला नाही.तो केला आहे कलेक्टर ,सिव्हिल सर्जन आणि पालकमंत्रीने.तुम्ही कोण तीनपाट माणसे तक्रार करणारे?ही आहे मनुस्मृती.मला , आम्हाला भ्रष्टाचार करण्याचा अधिकार आहे.तुम्ही आमच्यावर आक्षेप घेणेच गुन्हा आहे.ही आहे मनुस्मृती.
याच अपहार बाबत जळगाव जिल्हा कोर्टात खटला दाखल केला.तीन न्यायाधीश बदलले.एकानेही केस चालवली नाही.का?इतके वरिष्ठ विरोधात आक्षेप घेणे, त्यांना चोर साबीत करणे हाच मोठा गुन्हा आहे.असा विचार म्हणजेच मनुस्मृती.
आम्ही शेतकरी प्रशासकीय कामासाठी अर्ज करतो.ते नाही करीत .आम्ही शहाणपणा केला, प्रश्न केला तर म्हणे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सरळ जेलमध्ये टाकतात.ही आहे मनुस्मृती.आम्ही सरकारी नोकर आहोत.आणि तुम्ही तीनपाट माणसे आम्हाला काम सांगतात,काम विचारतात.तुम्हाला तसा अधिकार नाही.असे म्हणणे म्हणजेच मनुस्मृती.
एकनाथ खडसे जळगाव चे पालकमंत्री होते.झेडपीतील भ्रष्टाचार बाबत मदत मागितली.त्यांच्या अंगणात त्यांच्या घरापासून चाळीस फूट दूर सावलीत बसलो.वाट पाहात.आम्हाला उचलून जेलमध्ये टाकले.म्हणे पालकमंत्री खूप मोठा माणूस असतो.तो मुद्दाम भ्रष्टाचार करण्यासाठी आणि लपविण्यासाठी नियुक्त असतो.त्यांना प्रश्न करण्याचा ,मदत मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही .ही आहे मनुस्मृती.
मनुस्मृती चे वाचन चिंतन मनन न करता समर्थन किंवा विरोध करणे ,म्हणजे आम्हाला मनुस्मृती लागू होते.आम्ही मनुस्मृतीचे तंतोतंत अनुपालन करतो.कारण मनुस्मृती मुळातच मुर्ख, बिनडोक लोकांवर शहाण्या आणि बुद्धीमान लोकांनी कसे नियंत्रण ठेवावे ,तेच तर लिहीले आहे.आज सुद्धा माझ्यावर सरकारी नोकरांचे,आमदारांचे,खासदारांचे, मंत्रीचे नियंत्रण आहे.दहशत आहे.हीच तर आहे मनुस्मृती.मी सहजासहजी पालकमंत्री ला भेटून शकत नाही.वीस पोलिस दंडुका,बंदूका काढून दाखवतील.हिच तर आहे मनुस्मृती.मला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चार दिवस भेटले नाहीत.कंगणाला आणि सिनेमा कलाकारांना भेटले.हीच तर आहे मनुस्मृती.आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी गेलो.भ्रष्ट आमदाराला मंत्री बनवू नका ,असे सांगायला.चाळीस पोलिस आडवे आलेत.म्हणे तुम्हाला साहेब भेटणार नाहीत.भले दाऊद,गवळी,राजन यांना भेटतील.संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना भेटतील.हीच तर आहे मनुस्मृती.
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून जळगाव जिल्ह्यातील जमीन घेतली.कारण त्यांना भ्रष्टाचार करण्याचा अधिकार आहे.तो आम्ही मान्य केला आहे.हिच तर आहे मनुस्मृती.आम्ही रोज मनुस्मृती चे अनुपालन करीत आहोत.श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भेद मान्य करीत आहोत.कालच मला एका आमदाराचा फोन आला.म्हणे तुम्ही कोण आम्हाला आमची चूक सांगणारे? हिच तर आहे मनुस्मृती.यापेक्षा वेगळे काहीच नाही.
जामनेर तालुक्यातील शेतकरी जमीन मोजणीसाठी दिड वर्षांपासून भुमि अभिलेख कार्यालयात चकरा मारत आहेत.त्यांचे आमदार अंगावर गुलाल टाकून नाचत आहेत.हिच तर आहे मनुस्मृती.
मनुस्मृती नावाचे पुस्तक वाचले न वाचले काय,जाळले न जाळले काय,त्यात वर्णन केलेली माणूस प्रवृत्ती कधीच बदलणार नाही,मिटणार नाही.ती आजही कायम आहे.सरकारी नोकर, आमदार खासदार मंत्री हेच तर आजचे ब्रह्मपुत्र आहेत.हेच विष्णुपुत्र आहेत.हेच महादेवपुत्र आहेत.आम्ही फक्त त्यांच्या लिंगावर,पिंडावर दूध टाकत राहावे.हिच तर आहे मनुस्मृती.
जळगाव जिल्ह्यातील आव्हाणे येथे जिल्ह्यातील दहा लाख महिला पुरुष पंडित प्रदिप मिस्रांचे प्रवचन ऐकायला जात होते.ते भारतीय संविधान, विज्ञान,कायदे आणि न्यायव्यवस्था सांगत होते का?नाही.एक लोटा जल ,सब समस्याका हल.आम्ही दहा लाख लोक खानपान,बायको, पोरं,ढोरं,काम धंदा सोडून ऐकायला जात होतो.हिच तर आहे मनुस्मृती.एक हुषार मनु काहीतरी सांगत होता.आम्ही मुर्ख माणसे ऐकत होतो.तब्बल दहा दिवस.हिच तर आहे मनुस्मृती.
आम्हाला मतदानाचा अधिकार संविधानात मिळाला.जेणेकरून आपले हित जपणारा , आपला विकास करणारा माणूस विधानसभा,लोकसभेत गेला पाहिजे.आम्ही दोन चारशे रूपयात आमचे मत कोणालाही विकून टाकतो.दारूवाला असो कि रेतीवाला असो.हिच तर आहे मनुस्मृती.ती आमच्या नसानसात भिनलेली आहे कशी नाहीशी कराल?नाही होणार.जोपर्यंत तुम्ही जळून खाक होत नाहीत.
आम्ही मनुस्मृती चा कितीही निषेध, धिक्कार, तिरस्कार करीत असलो तरीही आम्ही मनुस्मृती चे तंतोतंत पालन करीत आहोत.पुस्तक जाळले,पाने जाळली .पण मन तेच,आचरण तेच.मग तो कोणत्याही धर्माचा,जातीचा,उपजातीचा,प्रजातीचा असला तरीही.मनुस्मृतीचे तंतोतंत पालन करतो.
एका राजाचा चेहरा रोगग्रस्त झाला होता.त्याने आरशात पाहिले.भयंकर राग आला.आरसा फोडून टाकला.तरीही चेहरा बदलला का?नाही!आरसा रोगग्रस्त नाही.मी रोगग्रस्त आहे.हे जो पर्यंत कळत नाही तोपर्यंत मनुस्मृती कितीही वेळा जाळली तरीही जळत नाही.
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
३१/५/२०२४.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत