देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बौद्धानो आपली स्वतंत्र व्यवस्था तयार करा

दहा वर्षात तुम्ही भारतातील अत्यंत पुढारलेला समाज म्हणून पुढे याल.
प्रत्येक बौद्ध बांधवांपर्यंत हा मेसेज पाठवा आणि शक्य तेवढ्या गोष्टींचं पालन आजपासून सुरू करा .

प्रस्तापितांनी तुम्हाला व्यवस्थेच्या दूर ठेवण्याचीच व्यवस्था केली आहे . पण आपण केवळ रडत बसणारं का . नाही
मग आता स्वयंपूर्ण होण्याची वेळ आली आहे .
काय करावे ?
आपली स्वतंत्र अर्थ व्यवस्था !
१.आपल्याच व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करा
२. आपल्याच पोराणा काम द्या
३. ⁠आपल्या लोकांनी दिलेले काम दर्जेदार करा . त्यांस धोका देऊ नका .
४. लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठी वस्तू समाजबांधवाकडून घेतली तर समाजाचा पैसा समाजातच खेळता राहिल. नागपूरच्या इंदोरा भागात आपल्या पैशावर सिंदी समाज मोठा झालाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे .
५. जिथे जिथे विहार किंवा छोटी मोठी संघटना कार्यरत आहे तिथे सर्व सभासदानी दरमहा १००/२००/३०० रुपये गोळा करून निधी जमविल्यास मोठा निधी तयार होईल यातून उपलब्ध जागेवर मल्टीपरपोज हॉल बांधून पुढील कार्य वेगाने पुढे नेता येईल .
६. शेयर मार्केट कडे सर्वांनी लक्ष द्यावे . लक्षात ठेवा बाबासाहेबांनी मुंबई येथे शेयर कंपनी स्थापन केली होती पण अती व्यस्ततेमुळे पुढे नेऊ शकले नाही .
दरमहा sip करुन म्यूचूअल फंड मध्ये निधी इन्व्हेस्ट केल्यास प्रत्येकाचे आर्थिक भविष्य संरक्षित होईल .
७. शासनाच्या अनेक विभागाच्या कौशल्य विकास योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणाना उद्योजकतेकडे वळणे आवश्यक आहे .
८. आरक्षण आता संपले आहे त्यामुळे नवीन वाटा तपासणे आवश्यक आहे . जास्तीत जास्त विद्यार्थी foreignएजुकेशन साठी तयार करावेत .
९.

आपली समाजव्यवस्था
१. आपल्या सर्व उपजाती ( महार) एकोप्याने रहाव्या .
२. ⁠उपजातीत भेदाभेद नको
३. ⁠उपजातीत जास्तीत जास्त रोटीबेटी व्यवहार करा.
४. ⁠आपल्या मुलांनी आंतरजातीत लग्न करुन धर्मांतर करु नये . आपली संस्कृती वाढली पाहिजे .
५. ⁠शक्यतो समाजातीलच गोरगरीब मुलींशी लग्न करा . किंवा इतर जातीत लग्न केले तर त्यांना इकडे आणा तुम्ही तिकडे जाऊ नका .
६. ⁠आपल्या लोकाना धोका देऊ नका . सध्या आपल्या लोकांचा आपल्या सर्वांना वाईट अनुभव आहे . आपल्या लोकांशी विश्वासपूर्ण व्यवहार करा .
७. ⁠आपल्या लोकांची फितुरी करु नका . तुम्ही इतरांच्या सोबत काम करताना आपल्या समाजाला विकू नका . आपल्या लोकांशी फितूर होऊ नका .
८. ⁠समाजाशी गद्दारी नको . समाजात काम करताना काही महत्वाच्या बाबी तुमच्या हाती लागतात तेव्हा प्रस्थापित मंडळी तुम्हाला जवळ करते व पद पैसा प्रतिष्ठा देऊन तुम्हाला अप्रत्यक्षरित्या खरेदी करते . अश्यावेळी बाबासाहेबांचा स्वाभिमान आठवा आणि त्यांच्या सारखे वागण्याचा प्रयत्न करा . स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला विकू नका .
९. ⁠आपल्यातील फितुर ओळखा . आपले अनेक बांधव आतून इतरांशी हातमिळवणी करून समाजाला विकत आहेत त्यांना ओळखा आणि त्याना उघडे करा . त्यांना कोणत्याही पद्धतीने समाजाची मदत होऊ देऊ नका .
१०. ⁠१४ एप्रिल ला आता समाजात खरा बंधुभाव निर्माण होईल अश्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करा . विहारविहारात चांगले धम्मप्रशिक्षक बोलवून समाजाची खरी चेतना जागी करा .
११. ⁠चांगल काम करणाऱ्यांचे पाय ओढू नका . पुढे येऊन चांगल काम करणे
फार कठीण असतं . तुमच्या आजूबाजूला असे काही लोक दिसतील जे खरोखर चांगल्या भावनेने काम करत असतात त्यांना मदत करा . काही चुका त्यांच्याही होतात त्या प्रांजलपणे त्यांना सांगा मात्र पटकन तोडातोड करू नका .
१२. सामाजिक काम करताना निस्वार्थी भावनेने काम करा . मला काही भेटेल ही भावना ठेवू नका . स्वतःला काही पाहिजे असेल तर सामाजिक काम करु नका व्यवसाय करा .
१३. ⁠आपसापसातील हेवेदावे दुरु ठेवा . एकत्र काम करताना माझा सहकारी मोठा होत असेल तर त्याचे पाय मी ओढू नये .
१४. ⁠समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांना वाळीत टाका . आपली अनेक लोक प्रतिगामी शक्तींसोबत काम करीत आहेत त्यांना वाळीत टाका . तसेच आपले अनेक लोक धम्माच्या विरुद्ध काम करतात त्यांना वाळीत टाका .

धर्मव्यवस्था
१. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन अनन्वित उपकार केले आहेत . सध्या समाजाची प्रगती यामुळेच झाली आहे . या त्रिरत्नाची जपणुक करा .
२. दर रविवारी ⁠विहारात जा . दर वर्षी धम्मप्रशिक्षण अटेंड करा .
३. ⁠मुलबाळाना धमाप्रशिक्षण वर्गात आवर्जुन पाठवा .
४. ⁠भिक्षुसंघाला नियमित भोजंदान करा व त्यांच्याकडून धम्म ग्रहण करा .
५. ⁠भिक्षुना दान द्या वृद्ध भिक्षूंच्या औषधाची व्यवस्था करा . वर्षावासाला यथोचित नियोजन करा .
६. ⁠धार्मिक संस्कार नियमित पाळा . धार्मिक दिनांना आयोजन करा .
७. ⁠धम्मकार्य करणाऱ्या संस्थांना दान द्या प्राधान्याने मदत करा .
८. वाईट भिक्षुना उघडे पाडा.
९. ⁠भिक्षूंच्या चुका स्पष्ठपने त्यांच्या निदर्शनास आणा .

राजकीय व्यवस्था
१. आपले राजकीय पक्ष सध्यातरी महाराष्ठ्रात काही करू शकतील अशी परिस्थिती नाही . त्यामुळे त्यांच्या मागे लागण्यापेक्षा जे आपले चांगले बांधव राजकारणात आहेत त्यांना सहकार्य करा .
२. ⁠सर्वांनी राजकारण करू नये . ती उर्जा व्यवसाय व व्यापारात लावा . आपल्या अनेक नेत्यांना प्रथापितानी टारगेट करुन संपवल आहे . याचे कारण समाजात सांस्कृतिक चळवळ मजबूत न होताच आपण राजकीय चळवळ करायला निघालो .
३. ⁠आता पहिले समाजाची सांस्कृतिक व धार्मिक चळवळ मजबूत केल्याशिवाय सक्रिय राजकारणावर एवढी उर्जा खर्च करु नये . काही बांधवाना पुर्ण वेळ राजकारण करू द्यावे व आपण त्यांना सहकार्य करावे .
४. ⁠सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जातीतील बौद्ध , मातंग व चर्मकार यांची लोकसंख्या अनुक्रमे ६५%, २०% व १०% एवढी आहे मात्र गेल्या विधानसभेत आमदारांची जातनिहाय संख्या – बौद्ध -४ , मातंग -८ तर चर्मकार १७ अशी आहे . ही पूर्णतः विसंगती आहे . याला प्रस्थापितबरोबरच आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
५. ⁠त्यामुळे आपले जास्तीत जास्त आमदार विधानसभेत कसे जातील यावर फोकस करा .
६. ⁠आपल्या आमदारांना पाडायला प्रस्थापित लोक आपलेच डमी उमेदवार उभे करतात . हे फितूर लोक आपल्या सक्षम उमेदवाराला पाडायचं काम करतात अश्या लोकाना ओळखा व आपले जास्तीतवजास्त उमेदवार विधानसभेत पाठवा .
७. ⁠प्रतिगामी पक्षात काम करणाऱ्या आपल्या लोकाना वाळीत टाका . त्यांच्याशी सामाजिक व्यवहार बंद करा .
८. ⁠पुरोगामी पक्षात काम करणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मागे समाजाने उभे राहावे .
९. ⁠केवळ आंबेडकरी पक्ष या नावावर समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या नादाला लागू नका .
१०. ⁠समाजाने आता मुस्लीमांसारखं तेलीसमाजासारखं एकगठ्ठा मतदान करण आवश्यक आहे .

प्रशासकीय व्यवस्था
१. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी याना सामाजिक संघटनांनी संपर्क स्थापून आपल्या लोकांची कामे तातडीने मार्गी लावने .
२. ⁠विविध विभागाच्या योजना प्राधान्याने आपल्या लोकाना देणे .
३. ⁠विविध विभागाच्या योजना अंमलबंजावणीसाठी सामाजिक संघटनांचा दबाव गट निर्माण करणे आवश्यक आहे .
४. ⁠समाजाची संपूर्ण शक्ती राजकारणात घालवण्यापेक्षा काही लोकांवर राजकारण सोडून आपण सर्वांनी प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजनांचा लाभ उठवण्यासाठी शक्ती पणाला लावली पाहीजे .
५. ⁠बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेली आर्थिक लोकशाहीच्या अनेक योजना आपण लक्ष न दिल्याने व्यर्थ वाया जातात . तसे होऊ देऊ नये .
६. ⁠शासनावर समाजमाध्यम व इतर माध्यमातून दबाव निर्माण करुन आपल्या हक्काचा निधी वापरून घेतला पाहिजे .
७. ⁠लोकसंख्यांच्या प्रमाणात निधी देण्यासाठी जनमत तयार केले तर सहज हे शक्य आहे . हे झाले तर कुठल्याही राजकीय शक्ती शिवाय समाजाचे उत्थान होईल .
८. ⁠प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सामाजिक सघटनांनी प्राधान्याने समन्वय साधला तर अनेक बाबी शक्य होतील .
९. ⁠प्रशासनात काम करणाऱ्यांनी व सामाजिक संघटनांनी आपला आपला इगो दूर ठेवून समाजातील गोर गरीब बांधवांच्या उत्थानासाठी एकत्र आले पाहिजे .

हा मेसेज सर्व बौद्ध ग्रुप वर पाठवा .
सर्व विहारात यावर चर्चा करा व स्थानिक पातळीवर नियोजन करा . नमो बुद्धाय !

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!