भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

रिपब्लिकन पार्टीने स. सै. दलाचे कलम १(२) दुर्लक्षित करून चालणार नाही

अशोककुमार उमरे

३० जानेवारी १९४४ ला कानपूर येथे दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाचे अधिवेशन भरविण्यात आले. या सभेला बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले. सदर सभेत ठराव क्र. ६ नुसार समता सैनिक दलाची दादासाहेब गायकवाड अध्यक्षतेखाली मसुदा समिती तयार करण्यात आली. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या समता सैनिक दलाचा संविधानाचा मसुदा १३ डिसेंबर १९४४ ला बाबासाहेबांनी स्वीकार केला.

बाबासाहेबांनी ३० सप्टेंबर १९५६ ला शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. बाबासाहेबांना धम्मदीक्षेच्या आणि कामाच्या व्यस्ततेमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे म्हणा तसेच बाबासाहेबांच्या अकाली महापरिनिर्वाणामुळे समता सैनिक दलाच्या संविधानात सुधारणा घडवून आणता आली नाही.

आम्ही शेड्युल कास्ट फेडरेशनची घटना दुरुस्ती करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कारभार तर सुरळीत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी समता सैनिक दलाची घटना दुरुस्ती करून तिला रिपब्लिकन पार्टीला जोडले असते तर आज रिपब्लिकन पक्षाला कार्यकर्त्यांची कमतरता भासली नसती.

आपण राजकारणाच्या सोयीचे तेवढेच घेतले पण रिपब्लिकन पक्षाच्या आघाडीची फौज समता सैनिक दलाला गतिमान करण्यासाठी जी आवश्यक तेवढी पाऊले उचलली नाहीत. वास्तविकता रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी समता सैनिक दलाची अत्यंत आवश्यकता असताना दलाकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे रिपब्लिकन पक्षांची संलग्न यंत्रणा उभी करण्यास सपशेल अयशस्वी ठरलो आहोत.

कोणत्याही संघटनेसाठी संविधान, घटना हे महत्वपूर्ण अंग आहे आणि त्यातल्या त्यात समता सैनिक दलाचे हे संविधान संविधानकर्त्या बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेचे असेल तर त्यात कोणतीही तडजोड न स्वीकारणारे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेला गतिमान करायचे असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने समता सैनिक दलाच्या घटनेतील कलम १(२) दुर्लक्षित करून चालणार नाही. आपण कलमाकडे दुर्लक्ष केल्याने तर आपल्यात समता सैनिक दलाचे सवतेसुभे उभे असलेले आपणाला दिसत आहे. १९४४ च्या समता सैनिक दलाच्या संविधानाचा विचार केला तर विद्यमान कार्यरत जेवढे काही समता सैनिक दल आहे हे संविधानाला धरून नसल्याने अवैधरित्या अवस्थेत कार्यरत आहेत.

बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भवितव्यासाठी समता सैनिक दलाची सुंसगत सांगड घालणे अत्यंत गरजेचे आहे. यादृष्टीने विचार केल्यास समता सैनिक दलाच्या संविधानाचे पहिलेच कलम बाबासाहेबांच्याच राजकीय पक्षांच्या दृष्टीने किती महत्वपूर्ण आहे, हे खालील कलमाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते.

समता सैनिक दल घटना-
कलम- १ (२) समता सैनिक दल हे ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनशी जोडले जाईल. प्रत्येक प्रांतातील आणि शहरातील समता सैनिक दलाच्या कार्याची देखरेख करण्यासाठी फेडरेशनचा अध्यक्ष कार्यकारिणीच्या सल्ल्याने फेडरेशनच्या एका नामनिर्देशित व्यक्तीची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करील आणि अशाप्रकारे नियुक्त व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रांत व शहर येथील समता सैनिक दल कार्य करील. डॉ बा आं ले आणि भा खं १७ भा ३ पा ५६७

समता सैनिक दलाच्या संविधानातील कलम १ (२) च्या कलमात अनुषंगिक अपेक्षित अशी सुधारणा घडवून आणल्या नंतर अशी सुधारणा व्हायला पाहिजे.- कलम १ (२) समता सैनिक दल हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोबत RPI या राजकीय पक्षाशी जोडले जाईल. प्रत्येक प्रांतातील आणि शहरातील समता सैनिक दलाच्या कार्याची देखरेख करण्यासाठी रिपाइं चा अध्यक्ष कार्यकारिणीच्या सल्ल्याने रिपाइं च्या एका नामनिर्देशित व्यक्तीची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करील आणि अशाप्रकारे नियुक्त व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रांत व शहर येथील समता सैनिक दल कार्य करील.

समता सैनिक दलाच्या काही कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की आरएसएस जसे बिजेपी सारख्या पक्षांवर वर्चस्व ठेवून बीजेपी पक्षाला संचालित करीत आहेत तसेच समता सैनिक दलानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीवर वर्चस्व ठेवून कार्य केले पाहिजे. मात्र आपण हे साफ विसरून गेलो आहोत की आर एस एस हे असंवैधानिक वर्णवर्चस्ववादी संघटना आहे. त्यामुळे त्यांच्या लेखी संविधानाला काही किंमत नाही हे आपण समजून घेतले पाहिजे.

परंतु बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनेच्या बाबतीत जे काही ते संविधानाच्या चौकटीत कटीबद्ध राहूनच करायचे आहे. बाबासाहेबांच्या वैचारिक अनुयायी कार्यकर्त्यांना संविधानानुसार कारभार करायचा असेल तर त्यांनी समता सैनिक दलानी दलाच्या संविधानातील कलम १ (२) कडे साफ दुर्लक्ष करता येणारच नाही.

यासाठी समता सैनिक दलानी संविधानानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून कार्यरत असले पाहिजे तरच बाबासाहेबांचे लेकरे एका घरट्यात येऊन एकसंघ संघटनशक्तीने बाबासाहेबांच्या विचार पक्ष संघटनेला न्याय देऊ शकतील आणि संसदेत जाऊन आपल्या हक्क आणि अधिकार यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अग्रेसर होतील.

बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया यात एकसुत्रीपणा आणायची असेल तर आता बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने गावपातळीपासून देशपातळीवर एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी समता सैनिक दलाला संवैधानिक प्रणालीने कार्यरत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

समता सैनिक दलाच्या घटनेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने दुरुस्ती घडवून आणून समता सैनिक दलाचा कारभार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीचे आपल्या अधिकारात घेऊन समता सैनिक दलाचे सुत्रसंचलन केले पाहिजे. हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अधिकार आहे.

-अशोककुमार उमरे
8698842402
रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
🔁🔁🔁🔃🔁🔁🔁

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!