देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

‘या जगात ईश्वर आहे की नाही?’

असेच गौतम बुद्ध एका गावातुन जात असताना गावातील एका गावकऱ्याने त्यांना ‘या जगात ईश्वर आहे की नाही?’ असा प्रश्न केला
तेव्हा गौतम बुद्ध त्या गावकऱ्याला म्हणाले, ‘मी तुला काही प्रश्न विचारणार आहे त्याची तू उत्तर दे. मग तुलाच समजेल की, या जगात, या विश्वात ईश्वर आहे का नाही. हे तुच ठरवशील असे म्हणुन गौतम बुद्धानी त्याला प्रश्न केला, ”आता तू या प्रकाशात उभा आहेस तुला सर्व रंग दिसतात हे कशामुळे?”
तसा तो गावकरी म्हणाला, ”माझ्या डोळ्यामुळे.”
गौतम बुद्धानी पुढचा प्रश्न केला, ”ही जी हवा वाहतेय पण दिसत नाही हे तुला कशा मुळे समजते?”
गावकरी म्हणाला, ”हवा दिसत नसली तरी ती आपल्या त्वचेमुळे आपल्याला जाणवते”
परत बुद्धानी प्रश्न केला, “या समोरच्या झाडाचे फळ गोड आहे का आंबट आहे हे कोण ठरवते?” गावकरी लगेच म्हणाला, “आपली जिभ”
मग बुद्धानी आपल्या जवळील फुल त्या गावकऱ्याला दिले व विचारले, “या फुलाला सुगंध आहे हे कोण ठरवते?” गावकरी म्हणाला, “नाक”
“…आणि आता मी जे काही बोलत आहे हे कोण ऐकत आहे” गावकरी म्हणाला, “माझे कान”
हे सर्व अवयव आपली पंचेद्रिय आहेत. त्यांनाच सर्व गोष्टी समजतात. आपल्याला डोळ्यांमुळे वस्तू दिसतात, आपले कण आवाज ऐकतात, आपल्या त्वचेला स्पर्श समजतो, जिभेला चव कळते, नाकाला वास समजतो. मग या सर्व क्रिया आपल्या शरीराला समजतात, जाणवतात
“आता मला सांग, ईश्वर असा पंचद्रियामध्ये तुला जाणवला आहे का?” गावकरी म्हणाला, “नाही”
मग आता तुच ठरव की ईश्वर आहे की नाही ते…

👌9326365396👌

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!