बदलापूर घटना आणि मनुस्मृती

-प्रमोद शिंदे
भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते खरंच बे अक्कल असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. अक्षय शिंदे यांच्या हत्येवर काहीही लिहायचं नाही असं ठरवलं होतं, परंतु आज सकाळी बोरिवली मध्ये झळकलेला बॅनर पाहिला आणि आधी हसलो मग लिहायला घेतलं. हा बॅनर असं सांगतोय की “बदला पुरा” फसनविसांच्या हातात बंदूक आहे आणि ते गोळी झाडततेय, अरे काय हा गाढवपणा?
फसनविसांनी कसला बदला घेतला? अक्षय शिंदे काय पाकिस्तान चा होता की चिन चा?
तिकडे चिन ने डोकलाम मध्ये घुसून अख्ख गाव वसवलं, पाकिस्तान सीमेवर रोजच दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैनिक मरतायेत, आशियाई टेररिस्ट रिपोर्ट सांगतोय की मागील दहा वर्षात 94 दहशतवादी हल्ले झाले आहेत, म्हणजेच जवळ जवळतीन महिन्यात दोन हल्ले झालेत, त्यात 5000 च्या वर भारतीय सैनिक शहीद झालेत. तिकडे बुडात शेपूट घालून बसलेला फुसका नेता काय करताना दिसत नाही, आणि तुम्ही काय इकडे बदला पुरा चे बॅनर लावताय?
अक्षय शिंदे याच्या गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाहीय, परंतू त्याच्या मृत्यूने अनेक बडे बडे नेते व राष्ट्रीय स्वयम सेवक संघाची उघडी पडलेली झाकली गेलीय, यात अनेक सत्यता सध्या बाहेर आल्यात. शाळेच्या ट्रस्टीवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप होत आहे. बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांची हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली आहे.
अक्षय शिंदेनं पोलीसांकडे मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचा याचिकेतून दावा करण्यात आलेला आहे. अक्षय शिंदे हा जर हायकोर्टानं स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भितीनं त्याचा एन्काऊंटर झाल्याचा याचिकेतून गंभीर आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे.
या याचिकेतून बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुस-याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची त्याच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती दिली गेली आहे. तसेच ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारी अद्याप फरार असल्यानं ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर प्रश्न निर्माण झालेला आहे.
याशिवाय अक्षय शिंदे याने पोलिसांच्या बंदुकीचा लॉक कसा उघडला? त्याला हे शिक्षण कोणी दिले? त्यात हे कृत्य मुंब्रा बायपास रोड या शांत रस्त्यावर का केले? त्याला तिकडे का नेण्यात आले? त्याला नेत असताना चेहऱ्यावर काळा कपडा नव्हता का? असता तर हे त्याने हे स्वतः कसे केले? आयुक्त स्थरातील पोलीस तिकडे काय करत होता? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यातून हेच सिद्ध होतय की मोठया नेत्याला व संस्थेला वाचविण्यासाठी छोट्याचा बळी दिला गेलाय.
आता बॅनर वर बोलू,
बलात्काऱ्याला गोळया झाडून बदला पुरा अशी बॅनर बाजी करणाऱ्यांना व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मला सांगायचे आहे की, कल्याण शिळफाटा येथे अक्षता म्हात्रे बलात्कार व हत्येमागील आरोपी मंदिरातील पुजारी श्यामसुंदर शर्मा, राजकुमार पांडे व संतोष कुमार मिश्रा व त्या अगोदर ऐरोली येथे अल्प वयीन मुलीवर बलात्कार व हत्या करणारा मंदिरातील महंत सत्यानंद महाराज हे चारही पुजारी कधी मारणार? की अक्षय शिंदे या कमजोर गरीब घरातील मुलाला मारून ब्राह्मण आपटे व संघाला वाचवायचे होते? की चारही बलात्कारी पुजारी ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना सोडायचे होते?
मनुस्मृती मधील “ब्राह्मण हत्या हे पाप” या नियमानुसार ब्राम्हण कितीही पापी असला तरी त्याला मारू नये हे लागू करुन बहुजनांच्या सरळ हत्या करुन तुम्हाला देशात पून्हा मनुस्मृती लागू करायची आहे का?
भाजपा मधील माझ्या भावांनो व बहिणींनो बघा यात सगळेच भरडले जाणार आहेत, आज इतर तर उद्या तुम्ही!
सुपातलं जात्यात जाणार हाय रं|
हा इतिहास खोटं कधी बोलणार नाय रं|
-प्रमोद शिंदे
प्रवक्ता, मुंबई प्रदेश
संभाजी ब्रिगेड
9967013336
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत