कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

संसदीय लोकशाही मध्ये न्यायालयाची हुकूमशाही चालत नाही:– प्रबुद्ध साठे

ठाणे:– एसी एसटी आरक्षण उपवर्गीकरणाला मान्यता देवून क्रिमीलेयरची आट लादण्याचे मत व एकदाच आरक्षण असावे पुढच्या पिढीला नको असे अन्यायकारक सल्ला देवून सुप्रिम कोर्टाने संविधान विरोधी निर्णय देवून न्यायालयाचा अवमान केला आहे, सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही संविधान सुप्रीम आहे आणि संविधानानुसार लोक सार्वभौम असून संसदीय लोकशाही मध्ये न्यायालयातील न्यायाधीशांची हुकूमशाही चालत नाही असे सत्य व धाडसी विधान प्रजासत्ताक जनता परिषद चे संस्थापक अध्यक्ष व चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे यांनी केले ते ठाणे येथे आरक्षण एसी एसटी जातीय उप वर्गीकरण क्रिमीलेयर या विषयी गंभीर चर्चेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी मुख्य मार्गदर्शक BRSP चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश माने साहेब,, डॉ असंग वानखेडे साहेब (लंडन), अच्युत भोईटे, आदी मान्यवर उपस्थित होते प्रबुद्ध साठे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, बहुजन समाजाचे ऐक्य बौद्ध धम्मानेच होवू शकते हाच विचार खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 आगस्ट 1956 रोजी दिल्ली येथील बंगल्यासमोर व्हरांड्यात कार्यकर्त्यां समोर बोलताना म्हटले होते आपल्या मध्ये महार मांग चांभार इत्यादी भेदभाव आहे ते नष्ट करून सर्वांना बौद्ध धम्मीय करु व त्यांच्या मार्फत हक्कांसाठी झगडू या, व इतर बहुजन बांधवांना बौद्ध धम्मात आणू, हा दुहेरी लढा आपल्याला लढावा लागेल व तो आपल्या ऐक्य शक्ती वर यशस्वी करू, या दिशेने आपण चळवळीची वाटचाल केली नसल्याने हिंदू दलित व्होट बॅंक तयार करण्याच्या राजकारण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणात उप वर्गीकरण या ब्राम्हणी षडयंत्राला आपणास सामोरे जावे लागत आहे न्यायालयाचा निर्णय आरक्षण वाटणीचा नसून SC, ST मध्ये भांडणे लावण्याचा विषय आहे, राष्ट्रीय संपत्ती चे समान वाटप करावे, न्यायालयात आरक्षण असावे,, एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाली तरच बहुजन समाजाला न्याय समानता व सन्मान मिळेल यासाठी आरक्षण लाभार्थी एसी एसटी ओबीसी व गरीब मराठा इत्यादी बहुजनांनी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सत्ताधारी बनावे असे ही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, या प्रसंगी डॉ सुरेश माने यांचेही मोलाचे मार्गदर्शन झाले,नॅशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन ठाणे, आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, सामाजिक विचारमंच व कार्य इंटरनॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप सावंत, सुशांत गायकवाड, संतोष खामबे, प्रभाकर भालेराव, संजय सामंत यांनी प्रयत्न केले, , कार्यक्रमासाठी बहुसंख्येने सुशिक्षित बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!