मुख्यपानराजकीय

“एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास…”, अनुराग कश्यपचे बोल.

कररुपाने जो निधी देशाने जमा केला आहे त्यातून इंडियाचं भारत करण्यासाठी वायफळ पैसे खर्च होतील असंही अनुरागने म्हटलं आहे.इंडिया-भारत वादावर अनुरागचं रोखठोक भाष्यइंडिया की भारत ही चर्चा मध्यंतरीच्या काळात चांगलीच रंगली होती. त्याचं कारण ठरलं राष्ट्रपतींनी G20 परिषदेसाठी विदेशातल्या पाहुण्यांना पाठवलेलं निमंत्रण. त्या निमंत्रण पत्रांवर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख होता. जिथून या चर्चेला आणि वादाला सुरुवात झाली. आता बेधडक आणि बिनधास्त अशी ओळख असलेल्या अनुराग कश्यपनेही याच विषयावर भाष्य केलं आहे. एका लहरी माणसामुळे सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो आहे असं वक्तव्य त्याने एका मुलाखतीत केलं आहे. त्याच्या वक्तव्यामुळे आता त्याला ट्रोल केलं जाण्याची आणि यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.“आपल्या देशाचं नाव बदलण्याचा निर्णय जर घेतला गेला तर पुन्हा एकदा करामधून जो निधी देशाला मिळाला आहे त्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होईल. कारण इंडिया-भारत मध्ये जर भारत हे नाव ठेवलं गेलं तर सगळ्या अधिकृत कागदपत्रांवर ते आणावं लागेल. सगळेच दस्तावेज नव्याने छापावे लागतील. एका लहरी माणसाच्या निर्णयाचे परिणाम सगळ्या देशाला भोगावे लागतील. मागचा-पुढचा विचार न करता निर्णय घेतला की आणखी काय होणार?” असा प्रश्न अनुराग कश्यपने नरेंद्र मोदींचं नाव न घेता उपस्थित केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!