कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणविचारपीठ

आंबेडकरवादी भारत मिशन

आजच्या काळात दलित चळवळीला डोळस Visionary आणि लढाऊ Militant अशा कार्यकर्त्यांच्या मध्यवर्ती संचाची नितांत गरज आहे. त्यातून आंबेडकरवादी भारत मिशनची निर्मिती करण्यात आली आहे. त्याला निमित्त ठरला आहे तो दलितांचे जातवार विभाजन करणारा सर्वोच्च न्यायालयाचा १ ऑगस्टचा ताजा वादग्रस्त निकाल. ज्या ज्या मोठ्या जाती – जमातींनी प्रस्थापितांना राजकीय आव्हान दिले, त्यांना एकाकी पाडण्याची नीती त्या निकालातून प्रतिबिंबित होत आहे.

तो निकाल न्यायालयाच्या अधिकार मर्यादांचे उल्लंघन करणारा आणि संसदेचा अधिक्षेप करणारा आहे. अनुसुचित जाती, जमातींमधील मोठ्या आणि छोट्या जाती यांच्यात दुही – कलह माजवण्यास तो निकाल कारणीभूत ठरू शकणारा आहे. लोकसभा निवडणुकीत ‘ संविधान ‘ हाच मुद्दा केंद्रस्थानी आल्यानंतर दलित – मागास, अल्पसंख्यांक या समाजांनी एकजुटीने भाजपविरोधात मतदान केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा वादग्रस्त निकाल आला आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

त्याविरोधात AIM हा समूह महाराष्ट्रातून बुलंद झालेला पहिला आवाज ठरला! संविधान तज्ज्ञ ऍड. डॉ. सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली एका पत्रकार परिषदेतून त्या फूटपाड्या नितिविरोधात रणशिंग फुंकण्यात आले. त्यातून ‘आंबेडकरवादी भारत मिशन ‘ मैदानात उतरले.

हे मिशन आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला अभिप्रेत राष्ट्र निर्मितीचे. अन् त्यासाठी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व या मूल्यांची कास धरलेले संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाचे.

‘ जिथे बहुसंख्याकांच्या लोकशाहीत, बहुमताच्या राजवटीत अल्पसंख्यांक समूहांना सुरक्षिततेची हमी मिळते,तीच खरी लोकशाही. ‘ बाबासाहेबांनी सांगितलेली ही लोकशाहीची कसोटी आहे.

त्यामुळे राष्ट्राची धर्म निरपेक्षता आणि सर्वांना समान संधी व दर्जा यांची जपणूक करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

अनुसुचित जाती, जमाती यांच्या संविधानिक अधिकारांचे रक्षण आणि हित संवर्धन हा त्याचाच एक भाग झाला. पण प्रत्यक्षात खरी लढाई आहे ती मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेची… त्यासाठी संविधान आणि लोकशाहीला अनुरूप मानसिकतेचा भारत घडवण्याची.

हे उद्दिष्ट साध्य करणे हेच आंबेडकराईट इंडिया मिशन चे AIM आहे. त्यासाठी धोरण निश्चिती आणि रणनीतीची आखणी, दलित समाजाच्या संघटना, संस्था यांच्याशी समन्वय, समविचारी चळवळींशी सुसंवाद राखून सहमती निर्माण करणे, यासाठी आंबेडकरवादी भारत मिशन आम्ही कार्यान्वित केले आहे.

त्याला आपलीही तन मन धनाने साथ, पाठिंबा, सर्वतोपरी बळ मिळावे, अशी रास्त अपेक्षा असून त्यासाठी कळकळीचे आवाहन याद्वारे आम्ही करत आहोत.

आपले विनीत

ऍड. डॉ. सुरेश माने

सुरेश केदारे
(मो: 8879997248)

सुनील खोब्रागडे

दिवाकर शेजवळ
( मो: 9022609692)

डॉ. जी.के. डोंगरगावकर

ॲड. धनराज जयमंगल

सतीश डोंगरे

प्रशांत रूपवते

अच्युत भोईटे

प्रा. अनिल वानखेडे

ॲड. अंकुश कांबळे

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
उत्तर भारतातील दलित संघटनांची साद;
२१ ऑगस्टच्या लढ्याला महाराष्ट्राचाही प्रतिसाद!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!