गुलाम कधी गुलाम होत नसतो,

समाज माध्यमातून साभार
गुलाम कधी गुलाम होत नसतो,
तर जो स्वतंत्र असतो
त्याला गुलाम करता येतं..
मोगलांनी ६०० वर्षे
राज्य करून आपल्याला गुलाम केलं,
हे जे सांगितलं जातं हेच मुळात असत्य आहे..
कारण मोगल यायच्या अगोदर इथल्या सनातनी हिंदू धर्माच्या वर्ण व्यवस्थेत तुम्ही गुलामच होते,स्वतंत्र कोण होते.?
तर इथले ब्राम्हणवादी
सनातनी मंडळी.
मग मोगल आल्यानंतर गुलाम कोण झाले, तुम्ही नाही,इथले ब्राम्हणवादी सनातनी, तुम्ही पहिलेच गुलाम होता…
नंतर काय व्हायचं.. राजे बदलत रहायचे, आज निजामशाही उद्या आदिलशाही, कधी बाबर, कधी अकबर असे राजे बदलत जायचे परंतु ब्राम्हणवादी सनातनी त्यांच्याशी समायोजित करून तुमच्यावर अत्याचार करत राहायचे,म्हणून तर नामदेव महाराज, त्यांचे समकालीन ज्ञानेश्वर महाराज आणि बहुजन समाजातील गोरा कुंभार,चोखामेळा, सावता माळी, तुकाराम महाराज ते संताजी जनगाडे महाराज यांच्या पर्यंतच्या संतांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून कोणा राजांबरोबर लढा न देता समाजातल्या वर्णव्यवस्थे विरुद्ध लढा उभारून नामदेव महाराजांनी स्थापन केलेला वारकरी धर्म बळकट करण्याचे काम केले,विठ्ठलपंत कुलकर्णी स्वतः ब्राम्हण असून त्यांची मुलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नामदेव महाराजांबरोबर गेले म्हणून ब्राम्हणवादी सनातनी मंडळींनी त्यांना जातीतून बाहेर तर काढलेच परंतु पुन्हा जातीत घेण्यासाठी शुद्धीकरण म्हणून इंद्रायणीच्या डोहात आत्महत्या करायला ह्याच ब्राम्हणवादी सनातनी मंडळींनी भाग पाडले हा इतिहास आहे.
पूर्ण स्वातंत्र्याची खरी चव पहिल्यांदा बहुजनांना “छत्रपती शिवाजी महाराज” यांनी दिली.म्हणून तर छत्रपतींसाठी बहुजन मरायला आणि शत्रूला मारायला तयार होत होता.त्याला वाटायचं हे “स्वराज्य” टिकलं पाहिजे.परंतु “छत्रपती संभाजी महाराज” गेल्यानंतर सत्ता आणि संपत्ती साठी आपल्याच लोकांनी फितुरी केली आणि पेशवाई बळकट होऊन बहुजन पुन्हा गुलाम झाले.
नंतरच्या काळात जगभरात साम्राज्य विस्तारासाठी पुन्हा आक्रमण होऊ लागली,त्यात डच, पोर्तुगीज,तुर्की यांनी आक्रमण केले आणि शेवटी व्यापारी म्हणून इंग्रज आले,प्रचंड पैसा आणि अत्याधुनिक शस्रांच्या जोरावर अवघ्या ५००० इंग्रजानी भारतावर ताबा मिळवला, पुण्यात पेशव्यांनी शरणागती पत्करून स्वतः ब्रिटिशांचा झेंडा उभारला,ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली. सनातनी ब्राम्हणवादी मंडळींनी त्यांच्याशी पुन्हा समायोजित केलं..बहुजनांना त्यात काही एक फरक पडत नव्हता,कारण पेशवाईत आधीच तो गुलामच होता…
आता मात्र संतांच्या ऐवजी महाराज सयाजीराव गायकवाड,महात्मा फुले,राजर्षी शाहू आणि डॉ.बी. आर.आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांनी बहुजनांच्या मुक्तीचा झेंडा हातात घेऊन संत आणि छत्रपतींच्या मार्गाने चालण्याचा निर्धार केला..
स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, सरदार पटेल,पं.जवाहरलाल नेहरू,सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्या सारखी मंडळी त्यांच्या त्यांच्या मार्गाने प्रयत्न करत असताना फुले, शाहू,आंबेडकर समाज जागृतीचे काम करत होते.तर सावरकर, हेगडेवार, गोळवलकर सारखी ब्राम्हणवादी सनातनी मंडळी स्वातंत्र्य मिळालेच तर हिंदू राष्ट्राची टूम काढून पुन्हा पेशवाई स्थापन करण्याचा प्रयत्न करत होती.. म्हणून तर महात्मा फुले यांना टिळकांनी आग्रह केला तरी स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग न घेता उलट इंग्रज आहे तोपर्यंत शिकून घ्या म्हणून बहुजनांना अवाहन करत होते…
एकीकडे स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती,तर दुसरीकडे जिन्नाला हाताशी धरून ब्राम्हणवादी सनातनी द्विराष्ट्रवादाची संकल्पना मांडू लागले,त्याला गांधी, नेहरू,पटेल विरोध करत होते…
अखेर भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिश स्वातंत्र्य द्यायला तयार झाला परंतु धर्माच्या आधारावर दोन देश होतील असं ठरलं…
मुस्लिमांना पाकिस्तान देण्याचे ठरले,ब्रिटिश जाताना आपल्या हातात देश देतील असं सावरकर आणि मंडळींना वाटत होतं, परंतु तसं न होता तो गांधी-पटेल-नेहरू यांच्या ताब्यात दिला गेला आणि त्यांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मांडून देशाचे संविधान लिहायची जबाबदारी डॉ बी.आर.आंबेडकर यांच्याकडे दिली..
धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या संकल्पनेने ब्राम्हणवादी सनातन्यांचे पुन्हा पेशवाई आणून बहुजनांना गुलाम करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले,त्या रागाची परिणीती म्हणून पुढे महात्मा गांधींचा खून करण्यात आला…
मधल्या काळातला इतिहास तुम्हाला माहीत आहे,ज्या देशात सुई बनत नव्हती तो देश अण्वस्र बनू लागला, विकसनशील देशांच्या यादीतून विकसित देशाकडे भारताची वाटचाल सुरू झाली…
आणि २०१४ साली विकास आणि अच्छे दिनाचे गाजर दाखवून छद्मी राजकारण करत आज पुन्हा हिंदू राष्ट्राच्या आडून सनातनी ब्राम्हण धर्म स्थापन करण्याचे प्रयत्न चालू झाले…
सत्ता-संपत्ती आणि स्वार्थासाठी “संभाजी महाराज” गेल्यानंतर जशी फंदफितुरी व गद्दारी झाली तसा प्रकार पुन्हा चालू झाला आहे..
अशा वेळी सर्वसामान्य जनतेने देश आणि संविधान टिकवण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून पुन्हा एकत्र येऊन लढा देण्याची काळाची गरज आहे..
तसं केलं नाही तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही हे निश्चित..
स्वतःच्या मुक्तीसाठी लढ़ा…
नाहीतर गुलामीची सवय होईल….
llजय जिजाऊ ll
||जय शिवराय||
||जय शंभुराजे||
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत